शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानार्जनाचे धडे ‘उमेद’चे यशस्वी पाऊल : ३४ विद्यार्थ्यांच्या पंखात भरले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:18 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी

ठळक मुद्देएक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली

राजाराम लोंढे-

कोल्हापूर : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी तालुक्यातील भंगारवाल्यांच्या ३४ मुलांना ज्ञानदानाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयीची आस्था निर्माण त्यांची शाळेतील नियमितता वाढण्यात ‘उमेद’ला यश आले आहे.

राज्य व केंद्र सरकार समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असते. पण उदारनिर्वाहासाठी अनेक कुटूंबांना भटकंतीशिवाय पर्याय नसतो. मराठवाड्यातील ऊस तोड मजूरांच्या मुलांच्या शिक्षणाचे तर यामुळे बारा वाजले आहेत. पाच महिने कारखाना कार्यस्थळावर रहायाचे आणि उर्वरित काळ गावाकडे रहावे लागत असल्याने ते शाळेत जाऊच शकत नाहीत. तीच अवस्था इतर भटक्या समाजातील विद्यार्थ्यांची आहे.

गावोगावी जाऊन भंगार गोळा करणारे, कचरा वेचक मुलांची संख्याही काही कमी नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसे अवघड काम असते. पण उमेद फौंडेशन चे डॉ. झुंजार माने, संदीप गिरवले, प्रकाश गाताडे, महादेव कुंभार, गोरख कदम, दिंगबर पाटील, दशरथ आयरे यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला. मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथे भंगार गोळा करणारा समाज राहतो. साधारणता वीस ते पंचवीस झोपड्या आहेत, रोज सकाळी उठले की कुटूंबातील मोठी माणसांसाबेत लहान मुलेही भंगार गोळा करण्यासाठी गावोगावी जातात. त्यामुळे या मुलांचा आणि शाळेचा संपर्कच येत नव्हता. रोजच्या भटकंतीमुळे शाळेत अनियमितता होती. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय ‘उमेद’ने घेतला.

पण त्या कुटूंबातील वडीलधाºयांची मानसिकता वेगळी होती. काहीही करून या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायचीच या इराद्याने ‘उमेद’चे सदस्य कामाला लागले. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली. सुरूवातीला मुले टाळाटाळ करायची पण खेळाची माध्यमातून त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली. जी मुले येत नाहीत, त्यांच्या घरी जाऊन त्यांना वही, पेन, खाऊ देऊन त्यांना शिकवणीपर्यंत आणले. सध्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे ३४ विद्यार्थ्यांना शिकवणीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये आता एवढी गोडी निर्माण झाली आहे, एक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीचा नीटनेटकेपणा आला असून अप्रगत मुले आता प्रगतीच्या वाटेवर आहेत.भंगार गोळा करून शाळेतभंगार गोळा करण्यांवर रोजीरोटी अवलंबून असल्याने आजही ६-७ मुली पहाटे उठून आपल्या कुटूंबासोबत सकाळी भंगार गोळा करण्यासाठी जातात. तिकडून नऊ वाजता परतल्यानंतर शाळेत जातात. 

ही मुले शाळेत अनियमित होती, त्यासाठी प्रबोधनपर जादा वर्ग भरवला. त्याचा परिणाम चांगला झाला असून शिक्षण विभागाच्या सकारात्मक भूमिकेने या मुलांना नियमित शाळेत पाठविण्यात आम्ही यशस्वी झालो.-राहूल कदम (समन्वयक, उमेद फौंडेशन) ‘उमेद’च्या वतीने मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथील भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानदानाचे धडे दिले जात आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर