शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानार्जनाचे धडे ‘उमेद’चे यशस्वी पाऊल : ३४ विद्यार्थ्यांच्या पंखात भरले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:18 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी

ठळक मुद्देएक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली

राजाराम लोंढे-

कोल्हापूर : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या सरकारने कितीही गप्पा मारल्या तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणाऱ्यांच्या मुलांना पूर्णपणे शिक्षण प्रवाहामध्ये आणणे शक्य झालेले नाही. ही वस्तुस्थिती ओळखून उमेद फौंडेशने शाहूवाडी तालुक्यातील भंगारवाल्यांच्या ३४ मुलांना ज्ञानदानाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. सातत्याने त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयीची आस्था निर्माण त्यांची शाळेतील नियमितता वाढण्यात ‘उमेद’ला यश आले आहे.

राज्य व केंद्र सरकार समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असते. पण उदारनिर्वाहासाठी अनेक कुटूंबांना भटकंतीशिवाय पर्याय नसतो. मराठवाड्यातील ऊस तोड मजूरांच्या मुलांच्या शिक्षणाचे तर यामुळे बारा वाजले आहेत. पाच महिने कारखाना कार्यस्थळावर रहायाचे आणि उर्वरित काळ गावाकडे रहावे लागत असल्याने ते शाळेत जाऊच शकत नाहीत. तीच अवस्था इतर भटक्या समाजातील विद्यार्थ्यांची आहे.

गावोगावी जाऊन भंगार गोळा करणारे, कचरा वेचक मुलांची संख्याही काही कमी नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसे अवघड काम असते. पण उमेद फौंडेशन चे डॉ. झुंजार माने, संदीप गिरवले, प्रकाश गाताडे, महादेव कुंभार, गोरख कदम, दिंगबर पाटील, दशरथ आयरे यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केला. मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथे भंगार गोळा करणारा समाज राहतो. साधारणता वीस ते पंचवीस झोपड्या आहेत, रोज सकाळी उठले की कुटूंबातील मोठी माणसांसाबेत लहान मुलेही भंगार गोळा करण्यासाठी गावोगावी जातात. त्यामुळे या मुलांचा आणि शाळेचा संपर्कच येत नव्हता. रोजच्या भटकंतीमुळे शाळेत अनियमितता होती. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय ‘उमेद’ने घेतला.

पण त्या कुटूंबातील वडीलधाºयांची मानसिकता वेगळी होती. काहीही करून या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायचीच या इराद्याने ‘उमेद’चे सदस्य कामाला लागले. हळूहळू करत पालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्या वस्तीवरच रोज सायंकाळी सहा ते साडे सात या वेळेत त्यांना शिकवणी सुरू केली. सुरूवातीला मुले टाळाटाळ करायची पण खेळाची माध्यमातून त्यांच्यामध्ये गोडी निर्माण झाली. जी मुले येत नाहीत, त्यांच्या घरी जाऊन त्यांना वही, पेन, खाऊ देऊन त्यांना शिकवणीपर्यंत आणले. सध्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे ३४ विद्यार्थ्यांना शिकवणीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये आता एवढी गोडी निर्माण झाली आहे, एक दिवसही मुले शिकवणी आणि शाळाही चुकवत नाहीत. त्यांच्यामध्ये कमालीचा नीटनेटकेपणा आला असून अप्रगत मुले आता प्रगतीच्या वाटेवर आहेत.भंगार गोळा करून शाळेतभंगार गोळा करण्यांवर रोजीरोटी अवलंबून असल्याने आजही ६-७ मुली पहाटे उठून आपल्या कुटूंबासोबत सकाळी भंगार गोळा करण्यासाठी जातात. तिकडून नऊ वाजता परतल्यानंतर शाळेत जातात. 

ही मुले शाळेत अनियमित होती, त्यासाठी प्रबोधनपर जादा वर्ग भरवला. त्याचा परिणाम चांगला झाला असून शिक्षण विभागाच्या सकारात्मक भूमिकेने या मुलांना नियमित शाळेत पाठविण्यात आम्ही यशस्वी झालो.-राहूल कदम (समन्वयक, उमेद फौंडेशन) ‘उमेद’च्या वतीने मल्हारपेठ (ता. शाहूवाडी) येथील भंगारवाल्यांच्या मुलांना ज्ञानदानाचे धडे दिले जात आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर