शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: April 29, 2016 00:54 IST

पाणीपुरवठा बंदचा पहिला दिवस : शहरात २७ टँकरद्वारे दिवसभर ४५ फेऱ्या; काम संपण्यास उजाडणार शनिवारची पहाट

कोल्हापूर : शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या गळती काढण्याचे काम गुरुवारी सकाळपासून युद्धपातळीवर सुरू झाले. तब्बल चार ठिकाणच्या मोठ्या स्वरूपाच्या गळती काढण्यात येत असल्याने हे काम पूर्ण होण्यास शनिवारची पहाट उजडणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिंगणापूर योजनेवर अवलंबून असलेल्या शहरातील निम्म्याहून अधिक भागास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील पाणीपुरवठा खंडित करावा लागला आहे. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. शहर पाणीपुरवठा विभागाने केलेल्या नियोजनानुसार गळती काढण्याचे काम सुरू झाले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा बंद केला. जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करण्यात आले. त्यानंतर जलवाहिनीतील पाणी बाहेर काढण्यास पहिल्याच दिवशी थोडा विलंब झाला. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथील जलवाहिनीतून अक्षरश: कारंजासारखे पाणी उडत होते. खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले. खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या मोटारी बसवून पाणी बाहेर काढावे लागले. जलवाहिनीतील तसेच खुदाई केलेल्या खड्ड्यातील पाणी बाहेर काढण्यात दुपारपर्यंतचा वेळ गेला. त्यानंतर काम सुरु झाले.गळक्या जलवाहिनी काढण्यासाठी चिवा बाजार येथे एक किलोमीटरची तर अयोध्या पार्क येथील पाचशे मीटरची जलवहिनी आधीच टाकण्यात आलेली आहे. फक्त त्याला क्रॉस कनेक्शन जोडण्यात येणार आहे. फुलेवाडी जकात नाका, अयोध्या पार्क, ए वन गॅरेज व चिवा बाजार अशा चार ठिकाणची ही गळती काढली जात आहे. चारही ठिकाणी जेसीबी, के्रन, पोकलॅँड, वेल्डिंग मशिन्स, गॅस कटर, जनरेटर सेट अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून एकूण साठ ते सत्तर कर्मचारी प्रत्यक्ष काम करत आहेत. हे काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. त्यासाठी रात्रीच्या उजेडासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनपाचे जलअभियंता मनिष पवार, उपजलअभियंता प्रभाकर गायकवाड, शाखा अभियंता बी. एम. कुंभार आदी जातीने कामावर लक्ष ठेऊन आहेत. सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील यांच्यासह नगरसेविका वनिता देठे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, माजी नरगसेवक मधुकर रामाणे, दुर्वास कदम आदींनी गळती काढण्याची कामाची चारही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनिष पवार आदी उपस्थित होते.टँकरने पाणीपुरवठा सुरूजलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला असल्याने पाणीपुरवठ्याची पर्यायी सोय म्हणून टँकरची सोय करण्यात आली आहे. शहरात भाड्याने घेतलेले १९ टँकर आणि महापालिकेचे आठ अशा एकूण २७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात या टँकरनी ४५ फेऱ्या केल्या आहेत. गुरुवारी पाण्याची टंचाई जास्त जाणवली नाही, परंतु आज, शुक्रवारपासून तीव्रता जाणवणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने गुरुवारपासून शहरातील चार महत्त्वाच्या ठीकाणी गळती काढण्याचे काम हाती घेतले. १) अयोध्या पार्क येथील गळती काढताना खड्ड्यात पाणी साठल्याने कामगारांना कसरत करावी लागली. २) फुलेवाडी जकात नाक्याजवळ गळती काढण्याचे सुरू असलेले काम ३) रिंगरोडवरील चिव्यांचा बाजार येथील गळती काढण्याचे काम सुरू असताना महापौर अश्विनी रामाणे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, उपायुक्त विजय खोराटे, शारंगधर देशमुख, मनीष पवार, सुनील पाटील, आदींनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली.