शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 18:55 IST

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा विषय आता का घ्यावा वाटला?उत्तर : मी शिरोळचा रहिवासी आहे. नदी प्रदूषणाची सर्वाधिक झळ याच तालुक्याला बसते. महिनाभरापूर्वी आमच्याच तालुक्यातील नांदणी या गावातील भाजीपाला खाल्ला तर कॅन्सर होतो, अशी आवई उठवली गेली, याचे मला फार वाईट वाटले. आमचा काही दोष नसताना उगीच बदनामी होत असल्याने याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. योगायोग असा की, मी चालवत असलेली ‘भूमाता’ ही संघटना याच वर्षी २७ जानेवारीला स्थापनेची २५ वर्षे साजरी करीत आहे. आपल्याच गावचा

प्रश्न सोडवून विधायक पद्धतीने रौप्यमहोत्सव साजरा करूया, म्हणून हा विषय हातात घेतला.प्रश्न : यासाठी वेगळा काही अभ्यास केला का?उत्तर : ज्या पंचगंगेत वीसएक वर्षांपूर्वी आपण पोहलो, पाणी प्यायलो, तेथे आता रक्षाविसर्जन करण्यासाठीही लोक पाण्यात उतरताना धजावत नाहीत, हे पाहिल्यानंतर ‘संगम ते उगम’ हा उपक्रम हाती घेण्याआधी सर्वंकष तयारी सुरू केली. प्रदूषणाच्या संदर्भात आतापर्यंत झालेले सर्व्हे, कोर्टाने दिलेले आदेश, विविध संस्थांचे निष्कर्षासह अहवाल या सर्वांचे वाचन करतानाच या विषयात काम करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या उपक्रमाची दिशा स्पष्ट केली. सर्व प्रकारची संख्यात्मक व विश्लेषणात्मक माहिती जमविली.

प्रश्न : संगम ते उगमच असा मार्ग निवडण्यामागे काय कारण?उत्तर : आतापर्यंत ‘उगम ते संगम’ अशी पंचगंगेची परिक्रमा झाली आहे. उगमाला स्वच्छ असणारी नदी संगमाला मात्र अतिप्रदूषित बनते. त्यामुळे प्रदूषणाची दाहकता कळावी या हेतूने ‘संगम ते उगम’ असा पायी दिंडीचा मार्ग निवडला. कुरुंदवाड ते प्रयाग चिखली या मार्गावर पंचगंगेत ७५० छोटे-मोठे प्रवाह येऊन मिसळतात, तर अतिप्रदूषण करणारी २५० ठिकाणे आहेत. यांना भेट देऊन पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पुढे पृथक्करण करून पुढील जनजागृती केली जाणार आहे.

प्रश्न : महिला आणि तरुणांनाच निवडण्यामागचे कारण?उत्तर : प्रदूषणाची सर्वांत जास्त झळ महिलांना बसते. त्यांच्याकडून प्रदूषणाला हातभारही लावला जातो. त्यामुळे या महिलांचे प्रबोधन करण्यासाठी म्हणून यांनाच या चळवळीत अधिक प्रमाणात सहभागी करून घेतले जाणार आहे. तरुणांकडे कल्पकता असते, जीव तोडून राबण्याची तयारी असते; त्यामुळे तरुणांनीच या उपक्रमात अधिकाधिक सहभागी व्हावे, यासाठी पंचगंगा खोºयातील महाविद्यालयांना भेटी देऊन आवाहन करीत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

प्रश्न : राजकारणविरहित उपक्रम आहे; मग खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांना घेण्यामागचे प्रयोजन?उत्तर : ते बरोबर आहे. राजकारण बाजूला ठेवले आहे. जनतेने मनात आणले तर कोणतेही प्रश्न सुटू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा विचार खासदार उदयनराजे व आमदार उल्हास पाटील यांनाही पटला. विशेष म्हणजे हे दोन्हीही लोकप्रतिनिधी जनतेचाच आधी विचार करतात. पूर्णपणे नि:स्वार्थी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी असल्यानेच त्यांना आपल्यासोबत घेतले आहे. आमदार उल्हास पाटील विधानसभेतही प्रदूषणावर आक्रमक मांडणी करतात. त्यांनी प्रदूषणाची झळ सोसली आहे.

प्रश्न : उपक्रमाची पुढील दिशा काय असणार?४ ते ७ जानेवारी अशी कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी संगम ते उगम पायी यात्रा काढून आम्ही थांबणार नाही. नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत काय आणि कधी करायचे याबाबतचा वर्षभराचा पूर्ण आराखडा तयार केला आहे. शासनाकडे काय मागायचे, जनतेला काय सांगायचे येथपासूनच प्रगत देशामध्ये कशा प्रकारे प्रदूषणमुक्ती होते येथपर्यंत सर्व काही तयार आहे. कोल्हापुरी पाणी पूर्वीपासूनच चांगले होते, ते आता बिघडले आहे. कोल्हापुरी गूळ, चप्पल याप्रमाणे कोल्हापूरचे पाणी जगात भारी ठरविण्याचे माझे स्वप्न आहे.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर