शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:43 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी व त्यावर उपाय सांगणारी वृत्तमालिका आजपासून...!कोल्हापूर : अपुरे सेवा रस्ते, या रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंग, वाहतुकीला अडथळे ठरणारे बसथांबे, बेशिस्त वाहतूक यांमुळे उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौक (पंचतारांकित औद्योगिक) पर्यंतचा सात किलोमीटरचा मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील या सात किलोमीटरच्या अंतरामध्ये गेल्या वर्षभरात २४ जणांना जिवाला मुकावे लागले आहे.उत्तर आणि दक्षिण भारतामधील रस्ते वाहतुकीचा दुवा असलेल्या, कोल्हापूरला महामार्गाच्या नकाशावर आणणाºया, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींची जीवनवाहिनी असणाºया राष्ट्रीय महामार्गाचे एक वेगळे महत्त्व आहे. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची दिवस-रात्र ये-जा सुरू असते. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला गती मिळावी, वाहनधारकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशान त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, या उद्देशाच्या उलट स्थिती सध्या या मार्गावर झाली आहे. या मार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौकापर्यंतचे अंतर मृत्यूचा सापळा बनला आहे. सात किलोमीटरच्या या मृत्यूच्या सापळ्याची सुरुवात ही कोल्हापूर शहराकडून शाहू नाक्यापासून येणाºया उजळाईवाडी उड्डाणपुलापासून होते. हा पूल महामार्गाच्या उजव्या बाजूपर्यंत बांधल्याने यावरून येणाºया वाहनांना महामार्गावर प्रवेश करताना जीवघेणी कसरत करावी लागते. या पुलावरून येणारी वाहने महामार्गाच्या कागलच्या दिशेने डाव्या बाजूला जाण्याऐवजी थेट महामार्गावर पुण्याकडून येणाºया वाहनांच्या आडवी जातात. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा चुकलेला थोडासा अंदाज मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पुलापासून अर्धा किलोमीटर मयूर पेट्रोल पंपाच्या पूर्व बाजूस असणारे वळण हे महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी न बदलता पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहे. या वळणाच्या आधी दिशादर्शक फलक असूनही ते सहजपणे दिसून येत नाहीत. भरीस भर म्हणून येथे बसथांबा आहे. यामुळे येथे रात्रीच्या वेळेस वाहने उलटून अपघात घडत आहेत. गोकुळ शिरगाव-कणेरी फाटा हा सिद्धगिरी मठ-म्युझिअम, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव, नेर्ली-तामगाव-सांगवडे यांना जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या फाट्यावर उड्डाणपूल आहे.औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी अवजड वाहने, एस. टी., बसेस, कारखानदार व कामगारांच्या वाहनांचे प्रमाण लक्षात घेता, हा पूल वाहतुकीस अपुरा ठरत आहे. हा पूल आणि त्यालगतच्या सेवारस्त्यांवर झालेले विविध स्वरूपांतील अतिक्रमण, या रस्त्यांवरच असणारे बसथांबे, अनेकदा रस्त्याच्या मध्येच थांबणारे वडाप यांमुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सकाळी आठ आणि सायंकाळी पाचनंतर येथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. या गर्दीतून वाट शोधत पुढे सरकणारे दुचाकीधारक, पादचारी, धोकादायकपणे वळण घेणारी अवजड वाहने, मोठ्या आवाजात वाजणारे हॉर्न असा मोठा गजबजाट येथे रोज असतो. यातून वाहन घेऊन जाणे एक दिव्यच ठरते. या फाट्यावर नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. कणेरीवाडी येथे सेवारस्त्यांची उपलब्ध नसल्याने हे ठिकाण धोकादायक बनलेले आहे. लक्ष्मी टेकडी चौक तर या मार्गावरील अपघातांसाठीचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.वाहतुकीला शिस्त नसल्याने येथे वारंवार अपघात घडतात. अवजड वाहनांना दुचाकी, अन्य वाहने धडकून झालेल्या अपघातांत अनेकांचा येथे मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता, महामार्गावरील वाहतुकीबाबतच्या असुविधा, वाहनधारकांचा बेजबाबदारपणा, बेशिस्त वाहतुकीमुळे हे सात किलोमीटरचे अंतर जीवघेणे ठरत आहे. ‘विमा, मेडिक्लेम पॉलिसी असेल तरच या मार्गावरून प्रवास करा,’ असे म्हणण्यासारखे येथील वास्तव आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस