शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सरकारी दवाखान्यात अनास्था, श्वान दंश रुग्णांच्या जीवावर; तरुणीच्या मृत्यूनंतर कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एैरणीवर

By भीमगोंड देसाई | Updated: March 6, 2024 18:08 IST

ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन वेळेत देण्यास टाळाटाळ

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : श्वान दंश झाल्यानंतर वेळेत आवश्यक ते सर्व उपचार करण्यात शासकीय दवाखान्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या लोकांना काही दिवसांनी जीव गमवावा लागत आहे. कुत्रा चावला आहे, असे सांगत सीपीआर, तालुका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर त्याच्यावर वेळ मिळेल त्यावेळी उपचार केले जातात. ज्याला कुत्र्याने चावा घेतला आहे, त्याला कोणत्या प्रकारचे उपचार घेतले पाहिजेत, हे माहीत नसते. त्यामुळे संबंधित एक इंजेेक्शन घेऊन निघून जातो, असे बहुतांशी श्वान दंश प्रकरणात होत आहे.

नागाळा पार्कातील युवतीचा श्वान दंश झाल्यानंतर रेबीजने मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा आणि श्वान दंशावरील उपचाराचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्व भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चोवीस तासांच्या आत ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावेच लागते. कुत्रा चाटला असेल, दात लागला नसेल, जखमांचे फक्त व्रण असेल तर केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागते. कुत्र्याचे दात लागले असतील किरकोळ जखम झाली असेल तर त्याच्या ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन चोवीस तासांत एक त्यानंतर तीन दिवसांनी, सात दिवसांनी, चौदा दिवसांनी, २८ दिवसांनी घ्यावे लागते. इंजेक्शन स्नायू आणि त्वचेत घ्यावे लागते. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रक्तस्त्राव झाला असेल ॲन्टी रेबीजसह चोवीस तासांत जखमेजवळ ॲन्टी रेबीज सिरमचे इंजेक्शन द्यावे लागते. श्वान दंश झालेल्या अनेकांना सिरमचे इंजेक्शन घ्यावे लागते, हेच सांगितले जात नाही. त्यामुळे कुत्र्याने शरीराचे लचके तोडले तरी केवळ ॲन्टी रेबीजचे इंजेक्शन देऊन पाठवले जाते. परिणामी काही दिवसांनंतर रेबीजची बाधा होण्याचा धोका असतो.

फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतोमहापालिका घरफाळा घेत असताना कुत्रा कर घेते. या करातून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बिजीकरण करणे बंधनकारक आहे. हे काटेकोरपणे केले जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यास निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. न्यायालयात भरपाईसाठी दाद मागता येते.

कधीपर्यंत अधिक धोका ?पाणी, उजेडाची भीती वाटणे, अन्न, पाणी गिळता न येणे, श्वसनाचा त्रास होणे अशी रेबीजची लक्षणे आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर चार दिवस ते सहा महिन्यांपर्यंत रेबीज होण्याचा धोका जास्त असतो. मेंदूपासून किती जवळ कुत्र्याने चावा घेतला तितका रेबीजचा धोका वाढत जातो. काही प्रकरणांत तीन, सहा वर्षांनीही रेबीज झाल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राhospitalहॉस्पिटल