शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

ज्येष्ठ मल्लांचे मानधन तीन वर्षे थकीत अपुर्‍या निधीचे कारण : उतारवयात मारावे लागत आहेत क्रीडा कार्यालयात हेलपाटे

By admin | Published: May 10, 2014 12:12 AM

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऐन तारुण्यात लाल मातीत दबदबा राखणारे व उर्वरित आयुष्यात आखाड्याशी एकनिष्ठ राहिलेल्या या मल्लांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या मानधनाचाच आधार आहे. मात्र निधीच्या कमतरतेचे कारण सांगून गेली तीन वर्षे मानधन देण्यात टाळाटाळ होत असल्याने या मल्लांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील हिंदकेसरी, डबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी, आदी स्पर्धांमध्ये यश मिळवून राज्याचा नावलौकिक वाढविणार्‍या ज्येष्ठ व वयाने साठी ओलांडलेल्या मल्लांना १९९५-९६ मध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीच्या काळात व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे दरमहा मानधन देण्याचा निर्णय झाला. १९९६ मध्ये सुरू झालेले मानधन अगदी विनाथकीत मे २०११ पर्यंत मिळत होते. मात्र, यानंतर अचानकपणे राज्य शासनाने हे मानधन देणे बंद केले. तब्बल ३६ महिने झाले हे मानधन अद्यापही दिलेले नाही. आपल्या उतारवयातही क्रीडा कार्यालयात हेलपाटे मारून मंत्र्यांना निवेदन देऊन ही मंडळी आता घाईला आली आहेत. या मानधनावरच आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याने उसनवारीही करावी लागत आहे. त्यांनी गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यांनी मी त्वरीत मानधन सुरू करतो असे अश्वासन दिले होते. तत्काळ मी सर्व मल्लांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गाठ घालून देतो असे सांगीतले होते मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. अगदी परवापर्यंत जिल्'ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या ज्येष्ठ मल्लांच्या थकीत मानधनाविषयी क्रीडा खात्याकडे पाठपुरावा करून तातडीने मानधन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं असा सवाल या मल्लांकडून विचारला जात आहे. आयुष्यभर कष्ट आणि उतारवयात आजारपण आयुष्यभर कुस्ती आणि कुस्तीच याचा विचार करून काही मल्लांनी आपले घरदार सोडून तालीम हीच आपली आई व घर म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले होते. तारुण्यात अनेक मैदाने या मल्लांनी गाजविली. मात्र, उतारवयात उदरनिर्वाह चालण्यासाठी शासनाने दिलेल्या या मानधनावर काही ज्येष्ठ मल्ल उदारनिर्वाह करत आहेत. मात्र मानधनच न मिळाल्याने हे मल्ल हवालदिल झाले आहेत. मानधनाचे बजेटच अपुरे राज्य शासनाने क्रीडा खात्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या मल्लांना अपुरा निधी मंजूर केला होता. त्यामुळे गेले तीन वर्षे हे मानधन रखडले होते. याचबरोबर ज्येष्ठ खेळाडूंची संख्या वाढत आहे येणारा निधी अपुरा आहे. त्यामुळ े हे मानधन या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र, येत्या आठ दिवसांत हे मानधन थेट या खेळाडूंच्या नावावर बँकेत जमा करण्यात येणार असून या प्रस्तावावर नुकतीच राज्याचे क्रीडा संचालकांनी सही केली आहे -नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी