शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘आयजीएम’ रुग्णालय हस्तांतराचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By admin | Updated: December 11, 2015 01:01 IST

प्रशांत रसाळ यांची माहिती : विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी; लवकरच निर्णय अपेक्षित

इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाची मंजुरी अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर चालविण्यास द्यावे किंवा शासनाकडे हस्तांतरित करावे, यावरून शहर विकास आघाडी व कॉँग्रेस यांच्यातील मतभिन्नता विकोपाला गेली होती. अशा पार्श्वभूमीवर आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संमत झाला. त्यास अनुसरून आमदार सुरेश हाळवणकर यांनी हा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपस्थित केला. या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली. मात्र, हा प्रस्ताव आरोग्य खात्याने तयार करून तो मंत्रिमंडळासमोर आणावा, असा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव तयार झाला असून, नजीकच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल, असेही मुख्याधिकारी रसाळ यांनी स्पष्ट केले.शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवणारी काळम्मावाडी धरणातून पाणी आणणारी योजना सुमारे ५५० कोटींपेक्षा अधिक खर्चाची असल्यामुळे ती नगरपालिकेला पेलणार नाही. त्याचबरोबर या योजनेसाठी नंतर येणारा देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन खर्च नगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारा ठरेल, असा अभिप्राय शासनाचा आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजना प्रत्यक्षात उतरण्याची संकल्पना धूसर झाली आहे.सुमारे ९८ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून सुरू आहे. ही योजना अमृत सिटी योजनेमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात राज्यातील औरंगाबाद महापालिकेसह काही नगरपालिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या स्थगितीमुळे इचलकरंजीची भुयारी गटार योजना युआयडीएसएसएमटी योजनेतूनच कार्यान्वित केली जात आहे, असेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)