शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी ...

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका! गेली ८२ वर्षे शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. विहीर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून विहिरीचे संपूर्ण बांधकामही ढासळत चालले आहे. परिणामी विहिरी मुजतात की काय, अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी शहराची जीवनदायिनी ठरलेल्या या दोन विहिरींचे जतन करण्यासाठी नगरपरिषदेने पुढे येण्याची गरज आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी १९७६ पर्यंत हुपरी व संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई असायची. १९७६ मध्ये हुपरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली अन् परिसरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा हुपरीशी विविध कारणांनी सातत्याने संपर्क येत असे. तत्कालीन गाव कामगार पोलीस पाटील यडगोंडा पाटील यांनी सन १९३९ मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब गावानजिक असलेल्या म्हेतरमळ्यामध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी दोन विहिरीची खोदाई करण्याबरोबरच त्यांचे भक्कम बांधकामही करून घेतले. त्यावेळेपासून आजपर्यंत सलग ८२ वर्षे अव्याहतपणे या विहिरीतून शहरातील गावभागाला पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांच्या प्रयत्नातून दहा वर्षांपूर्वी दूधगंगा नदीवरून शहरासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. तेव्हापासून या विहिरीचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. नगरपरिषदेच्या माध्यमातून या योजनेतून शहराला स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी बरोबरच शहरवासीयांचेही या विहिरींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा अनुभव येत आहे. परिणामी गेल्या ८२ वर्षांपासून शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असून शेवटच्या घटका मोजत असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे.

फोटो ओळी -हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका!