शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हुपरीतील विहिरी मोजताहेत अखेरच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी ...

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका! गेली ८२ वर्षे शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. विहीर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून विहिरीचे संपूर्ण बांधकामही ढासळत चालले आहे. परिणामी विहिरी मुजतात की काय, अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी शहराची जीवनदायिनी ठरलेल्या या दोन विहिरींचे जतन करण्यासाठी नगरपरिषदेने पुढे येण्याची गरज आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी १९७६ पर्यंत हुपरी व संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरूपाची टंचाई असायची. १९७६ मध्ये हुपरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना सुरू झाली अन् परिसरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांचा हुपरीशी विविध कारणांनी सातत्याने संपर्क येत असे. तत्कालीन गाव कामगार पोलीस पाटील यडगोंडा पाटील यांनी सन १९३९ मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या कानावर घातली. त्यांनी ताबडतोब गावानजिक असलेल्या म्हेतरमळ्यामध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी दोन विहिरीची खोदाई करण्याबरोबरच त्यांचे भक्कम बांधकामही करून घेतले. त्यावेळेपासून आजपर्यंत सलग ८२ वर्षे अव्याहतपणे या विहिरीतून शहरातील गावभागाला पाणीपुरवठा होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांच्या प्रयत्नातून दहा वर्षांपूर्वी दूधगंगा नदीवरून शहरासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. तेव्हापासून या विहिरीचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. नगरपरिषदेच्या माध्यमातून या योजनेतून शहराला स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधी बरोबरच शहरवासीयांचेही या विहिरींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा अनुभव येत आहे. परिणामी गेल्या ८२ वर्षांपासून शहराची पिण्याची व खर्चाच्या पाण्याची तहान भागविणा-या या दोन विहिरींची अतिशय दुर्दशा झाली असून शेवटच्या घटका मोजत असल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे.

फोटो ओळी -हुपरी (ता. हातकणंगले) शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी ८२ वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या दोन विहिरी सर्वांच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोजताहेत शेवटच्या घटका!