शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Corona vaccine-जिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:47 IST

CoronaVirus vaccine Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाईशनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला संथपणे लसीकरण सुरू राहिले. परंतु ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सरसकट परवानगी मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करायला सुरुवात केली. अशातच येणारी लस अपुरी पडू लागली. गेले दोन दिवस जिल्ह्यात लसटंचाई निर्माण झाली आहे. दिवसभरामध्ये केवळ उपलब्ध असलेले सहा हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दुपारनंतर ही प्रक्रियाच बंद करण्यात आली.

शुक्रवारी दिवसभरामध्ये राज्य पातळीवर लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु राज्यभरातच टंचाई असल्याने आता लसीची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकत होते. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही नागरिकांनी फोन करून लसीबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

यड्रावकर यांच्याकडून प्रयत्न

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील लसटंचाईमध्ये लक्ष घातले असून त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. राज्याला काही लाख डोस उपलब्ध होत असून त्यांतील काही डोस जिल्ह्यासाठी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठीच्या नियोजनासाठी वाहने तयार ठेवण्याच्या सूचना यड्रावकर यांनी केल्याचे सांगण्यात आले.

चौकट

दुसऱ्या डोसचे काय?

अनेकांनी मार्चमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र तो डोस घेऊन महिना होत आला असताना लस संपली आहे. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नेमका दुसरा डोस कधी घ्यायचा याचा खुलासा करण्याची मागणी होत आहे. हा खुलासा करताना किमान दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्याची मागणीही होत आहे.

चौकट

लसीकरणामध्ये राधानगरी अव्वल, तर हातकणंगले शेवटी

लसीकरणाच्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या डोसमध्ये राधानगरी तालुक्याने ६०.७१ टक्के लसीकरण करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे; तर हातकणंगले २८.७० टक्के लसीकरण करून शेवटच्या स्थानावर आहे. चंदगड ५४.४२ टक्के, गगनबावडा ४७.४५, शाहूवाडी ४१.०३, कागल ३७.४०, आजरा ३७.०१, गडहिंग्लज ३६.०२, पन्हाळा २९.७१, शिरोळ २९.२८, भुदरगड २९.०५, करवीर २८.७९ अशी अन्य तालुक्यांतील टक्केवारी आहे. या वयोगटातील १५ लाख २३ हजार ३७२ लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यांपैकी ३३.५४ म्हणजे ५ लाख १० हजार ८९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राधानगरी आणि चंदगड तालुक्यांनी लसीकरणामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल या तालु्क्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर