शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

हद्दवाढीची भीती, कोल्हापूर शहरालगतच्या गावांत बांधकामांचा धडाका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:51 IST

महापालिकेच्या नियमांची भीती

उद्धव गोडसेकोल्हापूर : हद्दवाढीसाठी प्रस्तावित असलेल्या शहरालगतच्या गावांमध्ये सध्या बांधकामांचा धूमधडाका सुरू आहे. हद्दवाढीचा निर्णय झाल्यास बांधकाम परवाने मिळवण्यात अडचणी येतील, या भीतीपोटी बांधकामांना गती आल्याचे दिसत आहे. परिणामी शहरालगतच्या गावातील बहुतांश रस्ते बांधकाम साहित्याने व्यापले आहेत.पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उजळाईवाडी, उचगाव, शिंगणापूर, बालिंगा या गावांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. शहर आणि गावाच्या सीमारेषा यापूर्वीच धूसर झाल्या आहेत, त्यामुळे यासह आणखी काही गावांचा हद्दवाढीत समावेश होण्याची चर्चा सातत्याने सुरू असते. सध्या प्राधिकरणच्या माध्यमातून बांधकाम परवाने घेऊन बांधकामे करता येतात. मात्र, शहराच्या हद्दीत समावेश होताच बांधकामांना महापालिकेचे नियम लागू होतील. त्यानंतर परवाने मिळवण्यात अडचणी येतील, अशी नागरिकांची भावना आहे. परिणामी हद्दवाढ होण्यापूर्वी बांधकामे उरकण्याकडे कल वाढल्याचे दिसत आहे.विशेषत: कळंबा, पाचगाव, शिंगणापूर, उचगाव, मोरेवाडी या गावांमध्ये नवीन घरांची संख्या वाढत आहे. प्रदूषणमुक्त वातावरण, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेमुळे हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये नवीन घरांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात या मागणीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. विशेष म्हणजे मूळ गावठाणांमध्येही जुन्या घरांच्या जागी नवीन घरे किंवा जुन्या घरांचे नूतनीकरण करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी बांधकाम साहित्याचे ढीग दिसत आहेत.महापालिकेच्या नियमांची भीतीबांधकाम परवाने देताना महापालिकेची मोठी नियमावली असते. प्लॉटमधील रस्ते, रिकाम्या जागा, पार्किंग अशा नियमांवर बोट ठेवले जाते. गावांमध्ये छोटे प्लॉट आहेत. महापालिकेच्या बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करणे कठीण असल्यामुळेच हद्दवाढीच्या निर्णयापूर्वी घरांचे बांधकाम करण्यास प्राधान्य दिले जात आहे.बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढशहरालगतच्या गावांमध्ये सध्या अपार्टमेंटमधील फ्लॅटपेक्षा रो-हाऊसला मागणी वाढत आहे. काही ठिकाणी स्वतंत्र बंगलो बांधण्याकडेही कल आहे. बांधकामांची संख्या वाढताच बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गुंतवणुकीला प्राधान्यशहरासह काही उपनगरांमध्ये लोकसंख्येची घनता वाढल्यामुळे सुविधांवर ताण पडत आहे. निवांतपणा मिळावा यासाठी अनेक लोक शहरालगतच्या गावांमध्ये घर घेण्यास प्राधान्य देत आहेत. काही लोकांकडून गुंतवणुकीच्या उद्देशाने प्लॉट किंवा तयार घरांची खरेदी केली जात आहे.

कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येताच घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमध्ये नवीन घर घेण्यास प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे बांधकामांची संख्या वाढली आहे.  - सागर पाटील - बांधकाम व्यावसायिक, पाचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूर