शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीची भीती, कोल्हापूर शहरालगतच्या गावांत बांधकामांचा धडाका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:51 IST

महापालिकेच्या नियमांची भीती

उद्धव गोडसेकोल्हापूर : हद्दवाढीसाठी प्रस्तावित असलेल्या शहरालगतच्या गावांमध्ये सध्या बांधकामांचा धूमधडाका सुरू आहे. हद्दवाढीचा निर्णय झाल्यास बांधकाम परवाने मिळवण्यात अडचणी येतील, या भीतीपोटी बांधकामांना गती आल्याचे दिसत आहे. परिणामी शहरालगतच्या गावातील बहुतांश रस्ते बांधकाम साहित्याने व्यापले आहेत.पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उजळाईवाडी, उचगाव, शिंगणापूर, बालिंगा या गावांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. शहर आणि गावाच्या सीमारेषा यापूर्वीच धूसर झाल्या आहेत, त्यामुळे यासह आणखी काही गावांचा हद्दवाढीत समावेश होण्याची चर्चा सातत्याने सुरू असते. सध्या प्राधिकरणच्या माध्यमातून बांधकाम परवाने घेऊन बांधकामे करता येतात. मात्र, शहराच्या हद्दीत समावेश होताच बांधकामांना महापालिकेचे नियम लागू होतील. त्यानंतर परवाने मिळवण्यात अडचणी येतील, अशी नागरिकांची भावना आहे. परिणामी हद्दवाढ होण्यापूर्वी बांधकामे उरकण्याकडे कल वाढल्याचे दिसत आहे.विशेषत: कळंबा, पाचगाव, शिंगणापूर, उचगाव, मोरेवाडी या गावांमध्ये नवीन घरांची संख्या वाढत आहे. प्रदूषणमुक्त वातावरण, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेमुळे हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये नवीन घरांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात या मागणीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. विशेष म्हणजे मूळ गावठाणांमध्येही जुन्या घरांच्या जागी नवीन घरे किंवा जुन्या घरांचे नूतनीकरण करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी बांधकाम साहित्याचे ढीग दिसत आहेत.महापालिकेच्या नियमांची भीतीबांधकाम परवाने देताना महापालिकेची मोठी नियमावली असते. प्लॉटमधील रस्ते, रिकाम्या जागा, पार्किंग अशा नियमांवर बोट ठेवले जाते. गावांमध्ये छोटे प्लॉट आहेत. महापालिकेच्या बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करणे कठीण असल्यामुळेच हद्दवाढीच्या निर्णयापूर्वी घरांचे बांधकाम करण्यास प्राधान्य दिले जात आहे.बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढशहरालगतच्या गावांमध्ये सध्या अपार्टमेंटमधील फ्लॅटपेक्षा रो-हाऊसला मागणी वाढत आहे. काही ठिकाणी स्वतंत्र बंगलो बांधण्याकडेही कल आहे. बांधकामांची संख्या वाढताच बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गुंतवणुकीला प्राधान्यशहरासह काही उपनगरांमध्ये लोकसंख्येची घनता वाढल्यामुळे सुविधांवर ताण पडत आहे. निवांतपणा मिळावा यासाठी अनेक लोक शहरालगतच्या गावांमध्ये घर घेण्यास प्राधान्य देत आहेत. काही लोकांकडून गुंतवणुकीच्या उद्देशाने प्लॉट किंवा तयार घरांची खरेदी केली जात आहे.

कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येताच घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमध्ये नवीन घर घेण्यास प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे बांधकामांची संख्या वाढली आहे.  - सागर पाटील - बांधकाम व्यावसायिक, पाचगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूर