शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा तालुक्यातील नावलीत जमिन खचली, सहा कुटूंबांचे स्थलांतर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 15:55 IST

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देपन्हाळा तालुक्यातील नावलीत जमिन खचलीसहा कुटूंबांचे स्थलांतर करण्याचे तहसिलदारांचे आदेश

कोल्हापूर : पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचत असल्यामुळे या गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी येथील जमिनीचा काही भाग खचलेला असल्यामुळे गावातील गट नंबर ३२५, ३२६, ३२७ आणि ३३८ या जमिनीमधील रहिवाशी असणाऱ्या कुटूंबांस धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जांभळेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे सूचना दिली होती. तहसिलदारांनी तत्काळ संबंधित तलाठ्यांना यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्यास सांगितले होते. तलाठ्यांनी ८ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन या जमिनी खचत असल्याचा अहवाल तहसिलदारांकडे दिल्यानंतर या कुटूंबांचे स्थलांतर करण्याबाबतच्या सूचना पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मौजे जांभळेवाडी येथे सर्जेराव आप्पाजी जांभळे, बाळू गणपती जांभळे, शिवाजी मारुती जांभळे, सुभाष मारुती जांभळे, पांडुरंग आप्पा जांभळे, आणि नामदेव आनंदा जाधव यांची घरे आहेत. अतिवृष्टीमुळे या जमिनी खचून या कुटूंबांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित कुटूुबांतील व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे आणि त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात आणि तसा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश पन्हाळ्याचे तहसिलदारांनी पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर