शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

भारताच्या परराष्ट्र धोरणात उद्दिष्टांचा अभाव : उत्तरा सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:11 IST

जगभरातील देश भारताचा उल्लेख ‘उगवती सत्ता’ असा करतात; पण भारतानेच अजून याचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणात ठोस उद्दिष्टांचा अभाव जाणवतो.

ठळक मुद्दे राजर्षी शाहू व्याख्यानमाला--महासत्ता होण्यासाठी देशाने जगाचे लष्करी नव्हे तर नैतिक नेतृत्व करण्याची गरज

कोल्हापूर : जगभरातील देश भारताचा उल्लेख ‘उगवती सत्ता’ असा करतात; पण भारतानेच अजून याचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणात ठोस उद्दिष्टांचा अभाव जाणवतो. सध्या अन्य राष्ट्रांशी भारताचे खूप चांगले संबंध असून, या सकारात्मक वातावरणात या देशाने लष्करी नव्हे तर नैतिकदृष्ट्या जगाचे नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी राजकीय नेतृत्वाने सक्रिय असले पाहिजे; नाही तर आपण नवी महासत्ता म्हणून पुढे न येता कायम ‘उगवती सत्ता’च राहू, अशी भीती डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी दै. ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार होते. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात झालेल्या बदलांचे प्रतिबिंब भारताच्या धोरणात आढळते. भारताकडे संस्कृती आणि इतिहासाची सौम्य सत्ता आहे. मोदींच्या सरकारने गेल्या चार वर्षांत शेजारी देशांना प्राधान्य दिले आहे. पाकिस्तान वगळता अन्य शेजारी देश तसेच म्यानमार, व्हिएतनामसारख्या दूरच्या शेजारी देशांशीही आपले चांगले संबंध आहेत. व्यापारवृद्धीसाठी सागरी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. या सगळ्यांत भारताचे अन्य देशांशी संंबंध प्रस्थापित करणे आणि आर्थिक वाढीचे फायदे वाटून घेणे हे सूत्र समान आहे. धोरणात्मक भागीदारी हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सूत्र असून भारताच्या धोरणात त्याचे प्रतिबिंब उमटते. आता भारताने जगाचे लष्करी नव्हे तर नैतिक नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी उद्दिष्टांमध्ये धोरणांमध्ये स्पष्टता हवी, जे गेल्या ७० वर्षांत झालेले नाही.त्या म्हणाल्या, १९ व्या आणि २० व्या शतकात झालेल्या दोन महायुद्धांनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक बदल झाले. अमेरिका व सोव्हिएट युनियन या दोन महासत्ता निर्माण होऊन द्विधृवीय राजकारण सुरू झाले. मात्र २० व्या शतकात सोव्हिएट महासत्ता संपली आणि अमेरिका एकमेव महासत्ता राहिली. अमेरिकेतील २००१ सालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत, चीन, रशिया यांसारख्या अनेक सत्तांचा उदय झाला, ज्यांनी अमेरिकेच्या प्रभुत्वाला आव्हान दिले. आज युद्धे होत नाहीत, मात्र हिंसा सुरूच आहे. जगभरातील देश अन्य देशांशी संबंध प्रस्थापित करणे आणि संतुलन सांभाळण्याचे राजकारण करीत आहे; तर दुसरीकडे ध्येयधोरणांना विरोधही करीत आहेत. या सगळ्या परिस्थितीत भारताने ठामपणे आपले नेतृत्व सिद्ध केले पाहीजे.श्रीराम पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले.राजर्षी शाहू व्याख्यानमालेत शुक्रवारी उत्तरा सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.