शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

कोल्हापूर : कुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुख; कुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:58 IST

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुखकुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

कोल्हापूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे माऊस मीडिया प्रकाशित व सोनाली नवांगुळ लिखित ‘जॉयस्टिक’ या कुमारकथांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, आजच्या बदलत्या विश्वामुळे कुमार वयोगटाच्या कालखंडातील कथा वाचण्यास मिळत नाहीत. या कालखंडातील वयोगटांसाठी लिहिणे म्हणजे आव्हानात्मक काम आहे. आजच्या बालमनाचे वय ५ ते ८ झाले आहे. पूर्वी ५ ते १० होते. त्यात ८ ते १५ हा वयोगट कुमार होता; मात्र आजची परिस्थितीच वेगळी आहे.

बालमने झपाट्याने बदलत आहेत. अशा काळात भावविश्व समजून कुमार गटासाठी ‘जॉयस्टिक’ सारख्या पुस्तकाची निर्मिती होणे ही चांगली माणसे घडविण्याचे काम आहे. अशा प्रकारची निर्मिती आजच्या साहित्यिकांकडून अपेक्षित आहे.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, सत्त्व टिकवण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती आवश्यक आहे. कुमारांसाठी लिहिणारे लेखकच नाहीत. जे वय कुमार गटाचे आहे. त्या कालखंडासाठी चांगले लिहिणारे पाहिजेत. हीच बाब लेखिका सोनाली व प्रकाशक अमृता यांनी जाणून ‘जॉयस्टिक ’ची निर्मिती केली आहे.

बदलत्या वर्तनशास्त्रानुसार नव्या मुलांचे मानसशास्त्र जणू या साहित्यातून या दोघींनी अधोरेखित केले आहे. आजची मूलं शहाणी आहेत. त्यांच्या कल्पनाविश्वातील भावना या पुस्तकाच्या रूपातून साकारल्या आहेत. माणसे मोठी झाली, तरी त्यांच्यातील लहानपण जागे असते. केवळ ते व्यक्त होत नाही. असे मनोगत लेखिका नवांगुळ यांनी व्यक्त केले.

यावेळी पत्रकार अजय कांडर यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता वाळिंबे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मुग्धा गोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूरLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख