शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुख; कुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:58 IST

आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकुमार साहित्याचा अभाव धोकादायक : लक्ष्मीकांत देशमुखकुमार कथा जॉयस्टिकचे प्रकाशन

कोल्हापूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या अवस्थांतराच्या काळात बाल व प्रौढांसाठीच्या साहित्याची निर्मिती होत आहे; मात्र, कुमार साहित्याचा अभाव आहे; त्यामुळे अवस्थांतराच्या स्थितीत असणाऱ्या पिढीला या साहित्याचा अभाव असणे धोकादायक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे माऊस मीडिया प्रकाशित व सोनाली नवांगुळ लिखित ‘जॉयस्टिक’ या कुमारकथांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, आजच्या बदलत्या विश्वामुळे कुमार वयोगटाच्या कालखंडातील कथा वाचण्यास मिळत नाहीत. या कालखंडातील वयोगटांसाठी लिहिणे म्हणजे आव्हानात्मक काम आहे. आजच्या बालमनाचे वय ५ ते ८ झाले आहे. पूर्वी ५ ते १० होते. त्यात ८ ते १५ हा वयोगट कुमार होता; मात्र आजची परिस्थितीच वेगळी आहे.

बालमने झपाट्याने बदलत आहेत. अशा काळात भावविश्व समजून कुमार गटासाठी ‘जॉयस्टिक’ सारख्या पुस्तकाची निर्मिती होणे ही चांगली माणसे घडविण्याचे काम आहे. अशा प्रकारची निर्मिती आजच्या साहित्यिकांकडून अपेक्षित आहे.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, सत्त्व टिकवण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती आवश्यक आहे. कुमारांसाठी लिहिणारे लेखकच नाहीत. जे वय कुमार गटाचे आहे. त्या कालखंडासाठी चांगले लिहिणारे पाहिजेत. हीच बाब लेखिका सोनाली व प्रकाशक अमृता यांनी जाणून ‘जॉयस्टिक ’ची निर्मिती केली आहे.

बदलत्या वर्तनशास्त्रानुसार नव्या मुलांचे मानसशास्त्र जणू या साहित्यातून या दोघींनी अधोरेखित केले आहे. आजची मूलं शहाणी आहेत. त्यांच्या कल्पनाविश्वातील भावना या पुस्तकाच्या रूपातून साकारल्या आहेत. माणसे मोठी झाली, तरी त्यांच्यातील लहानपण जागे असते. केवळ ते व्यक्त होत नाही. असे मनोगत लेखिका नवांगुळ यांनी व्यक्त केले.

यावेळी पत्रकार अजय कांडर यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता वाळिंबे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन मुग्धा गोरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूरLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख