शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट

By admin | Updated: October 16, 2015 00:37 IST

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : वेळीच उपाय योजण्याची भाविकांची मागणी

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात पाणी हिरवट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रदूषणामुळे भाविक नाराज होत आहेत.महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नृसिंहवाडी या ठिकाणी अनेक भाविक दररोज मोठ्या संख्येने कृष्णा-पंचगंगा नदीत स्नान करतात. त्यानंतर श्री दत्त दर्शनासाठी जातात. यंदा पावसाने दडी मारल्याने दरवर्षीप्रमाणे येथील कृष्णा-पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहिल्याच नाहीत. त्यामुळे पाणी साचून राहिल्याने या वर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच जलप्रदूषणाला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नदीचे पाणी अतिशय संथ गतीने पुढे जात आहे. नृसिंहवाडी गावातून येणारे पाणी थेट नदीत मिसळत आहे. शिवाय गुरुवारी सकाळपासून नदीतील पाणी हिरवट झाले आहे. पाण्याला जास्त प्रवाह नसल्याने ते पाणी दत्त मंदिर परिसरात साचून राहिले आहे. या पाण्याला एक प्रकारचा वास येत आहे. हे पाणी असेच साचून राहिले तर यात्रेकरू व ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाळ आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत. कृष्णा-पंचगंगा नदीत थेट मिसळणाऱ्या सांडपाणी व जलप्रदूषणाबाबत योग्य ती उपाययोजना आतापासून सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.