शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘आघाडीचं घोडं’ शेवटपर्यंत कृष्णेत न्हालंच नाही

By admin | Updated: February 6, 2017 23:27 IST

कऱ्हाड दक्षिण : काँगे्रस, राष्ट्रवादीने भरलेत स्वतंत्र अर्ज, उमेदवारांना दिले एबी फॉर्म

प्रमोद सुकरे ---कऱ्हाड --जिल्ह्यात कुठे नव्हे ती कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गेले पंधरा दिवस चर्चेभोवती फिरणारे ‘आघाडीचं घोडं’ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही ‘कृष्णेत’ न्ह्याल्याचं पाहायला मिळालं नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी ओढून ताणून का होईना सर्व जागांवर एबी फॉर्मसहीत उमेदवार उभे करण्याचा खटाटोप केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मनेही कलुषित झाली असून, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचं दक्षिणेत ‘जुळता जुळेना’ अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी करण्यात दोन्ही काँग्रेस नेत्यांना सुरुवातीपासूनच रस दिसत होता. गत महिनाभरातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथी पाहता दोन्ही काँग्रेसना आघाडी करण्याची गरजही निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात कुठे नव्हे ती कऱ्हाड दक्षिणेत दोन्ही काँग्रेसची आघाडी पाहायला मिळेल, असे तालुक्यात बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच बारामतीच्या ‘दादा’ मंडळींनीही याला ग्रीन सिग्नल दिला होता. कऱ्हाडचे पृथ्वीबाबाही ‘हात’ दाखवून अवलक्षण नको या भूमिकेतून आपण आघाडीला सकारात्मक असल्याचे सांगत होते. मुंबई दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी आघाडीच्या बैठकीबाबतची चर्चा करण्याची जबाबदारी आपल्या ‘लाडक्या नानांवर’ टाकली. रेठरेकर दादा, वाठारकर आबा आणि उंडाळकर भाऊंच्याबरोबर विजयनगरच्या नानांनी काही बैठकाही केल्या. त्यातून ना काही रस निघाला, ना कोणी कस लावला. सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरूच होती. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करताना सर्वकाही अलबेल असेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र रात्रभर कार्यकर्त्यांना वेगळीच फोनाफोनी झाली. सकाळी उठल्यापासून कार्यकर्त्यांची दाखले गोळा करण्याची गडबड पाहायला मिळाली आणि अर्ज दाखल करायला सुरुवात केल्यावर दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे दक्षिणेतही काँगे्रस राष्ट्रवादी आमने-सामने लढणार का? याचे ‘उत्तर’ राष्ट्रवादीच्या कऱ्हाडातील आमदारांनाच माहीत. दोन्ही अध्यक्षांचं झालंय कोडं कोळे गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता पाटील दोघेही इच्छुक आहेत. सोमवारी या दोघांनीही स्वतंत्र अर्ज भरले आहेत. आता कोळे गणाचा विषय मिटविताना कोणत्या अध्यक्षाला उभे करायचे आणि कोणत्या अध्यक्षाला खाली बसवायचे हा दोन्ही काँग्रेस नेत्यांसमोरील प्रश्न सोडवायचा झाल्यास कसा सोडविला जाईल, याचीही चर्चा सुरू आहे. ....म्हणे अजूनही आशा आहेअर्ज मागे घेण्याची अजूनही मुदत आहे. तोपर्यंतही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते. ऐनवेळी वाटाघाटी पूर्ण होऊन निवडणूक आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाऊ शकते, अशी आशा दोन्ही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उराशी बाळगून आहेत. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरू नये याची काळजी आता नेत्यांनीच घेतलेली बरी. एबी फॉर्म म्हणजे काय रं भाऊ?सोमवारी दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पक्षाचा एबी फॉर्म कोणाला मिळणार याची चर्चा आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. अनेकजण एबी फॉर्म म्हणजे काय रं भाऊ?, असे विचारताना दिसत होते. इच्छुक उमेदवार आमचे नेते एबी फॉर्म पाठवून देणार आहेत, याची वाट पाहत बसले होते. प्रत्यक्षात हे नेते एबी फॉर्म घेऊन आले. त्यांनी ते सुपूर्द केले. मात्र, नेत्यांनी एबी फॉर्म नक्की कोणाला दिला? आहे याची माहिती कोणालाच लागताना दिसत नव्हती. कोळे, वारुंजी आणि कार्वेचे गणित बसेनाकाँग्रेसला गट आणि गण किती अन् राष्ट्रवादीला गट अन् गण किती यावर नेतेमंडळींच्यात चर्चाच सुरू आहे. प्रामुख्याने कोळे, वारुंजी आणि कार्वे या तीन गटांतील उमेदवारीवरून नेत्यांच्यात मतभिन्नता आहे. त्यांच्यात एकमत होताना दिसत नाही. म्हणून सरतेशेवटी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय; पण हे तर ‘प्रेशर पॉलिटिक्स’ असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत.