शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृष्णा नदी पात्राबाहेर

By admin | Updated: August 7, 2016 23:54 IST

नदीकाठी चिंता : जामवाडीतील २0 कुटुंबांचे स्थलांतर, कोयनेतून १७ हजार क्युसेकने विसर्ग

सांगली : पावसाचा जोर कमी झाला असला तरी, कोयना धरणातून रविवारी १७ हजार ६९०, तर चांदोली धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा आणि वारणा नदीकाठी चिंतेचे वातावरण पसरले आहे. सांगली शहरातील जामवाडी परिसरात नाल्यावाटे नदीचे पाणी घुसल्याने तेथील २० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवारी कृष्णेच्या पातळीत वेगाने वाढ होणार असल्याने येथील शंभरावर कुटुंबांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी पावसाचा जोर कमी झाला. सांगली शहरातही सायंकाळी अर्धा तासच पावसाने हजेरी लावली. चांदोली धरण परिसरातही रविवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्याने अद्याप चांदोलीतून १८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणेकाठी पूरस्थिती कायम आहे. वारणेपाठोपाठ आता कृष्णा नदीही पात्राबाहेर पडली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजता नदीची पातळी ३४ फुटांवर गेली होती. त्यामुळे जामवाडी परिसरात अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. कोयना धरणातून रविवारी दुपारी २ वाजता १७ हजार ६९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. विसर्ग मोठा असल्याने सोमवारी कृष्णा नदीपात्रात वेगाने वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सांगली शहरासह कृष्णाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सांगली शहरात दोनवेळा जामवाडी परिसरातील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. कोयनेतील विसर्ग आणखी दोन दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली शहरातील नदीकाठच्या अनेक वस्त्या पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. येथील कुटुंबांच्या स्थलांतराची व्यवस्था महापाालिका प्रशासनाने केली आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाने सातत्याने नदीपातळी व विसर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. (प्रतिनिधी) कृष्णा नदीची पातळी (फूट) बह १२.६ ताकारी ३६.१ भिलवडी ३७.६ आयर्विन ३४ अंकली ३९.९ म्हैसाळ बंधारा ४५ रविवारी सकाळी नोंदलेला पाऊस (मिलिमीटर) सांगली ३ तासगाव १२ पलूस १६ शिराळा ४ मिरज २२.७0 विटा २ आटपाडी ५ कवठेमहांकाळ ८.२0 जत १0 कडेगाव १0.८0 इस्लामपूर ४