शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे २ नोव्हेंबरपासून 'इतके' दिवस बंद राहणार, कारण.. 

By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2023 16:03 IST

उत्पादनाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकांची असते

कोल्हापूर : कृषी बी-बियाणांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे असताना राज्य सरकारने नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतूदी बि-बियाणे, खते विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे या कायद्यांना विरोध करण्यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाण, किटकनाशके, रासायनिक खते व्यापारी संघटनेच्यावतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील दोन हजार कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम व सचिव सागर खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य सरकारने विधेयक ४०,४१,४२, ४३ व ४४ नुसार कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांसाठी नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, या कायद्यातील तरतुदी अत्यंत जाचक आहेत. यामुळे विक्री-व्यवसाय करणे अशक्य होईल. त्यामुळे हे कायदे करु नका अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. प्रस्तावित कायद्यातील कृषी निविष्ठा विक्रेता लेबल क्लेमनुसारच विक्री करतो. मात्र, त्याचा वापर कृषी केंद्राच्या नियंत्रण बाहेर असल्याने तो कायदा कृषी विक्रेत्यांना लागू करू नये, प्रस्तावित कायद्यात कृषी निविष्ठाबाबत तक्रार असल्यास शेतकरी कृषी विभाग सोडून पोलीस स्टेशनला तक्रार करू शकणार आहे. मात्र, पोलिस विभागाला कृषी विभाग व कृषी निविष्ठेचे ज्ञान नसल्याने ही तक्रार जुन्या कायद्याप्रमाणे कृषी अधिकाऱ्यांकडेच करावी अशी तरतूद करा, प्रस्तावित कायदा ४३ मध्ये खते दळणवळण कायद्यांतर्गत असल्याने व बी-बियाणे काळाबाजार नियंत्रणाची तरतूद आहे. मात्र, कषी निविष्ठांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने हा कायदा कृषी विक्रेत्यांना लागू करू नका, कायदा ४४ मध्ये बोगस निविष्ठा आढळल्यास झोपडपट्टी गुंड, अंमली पदार्थ माफिया व हातभट्टी गुंड या ॲक्टखाली कृषी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली आहे. मात्र, विक्रेते शासनमान्य कंपनीने उत्पादित केलेल्या निविष्ठांची सीलबंद पॅकमध्ये विक्री करतात. उत्पादनाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकांची असते. त्यामुळे या कायद्यात कृषी विक्रेत्यांना आरोपी करू नका अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र