शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कोकण’ एस.टी. ‘सीबीएस’मधून सोडा

By admin | Updated: January 13, 2015 00:51 IST

चंद्रकांतदादांची सूचना : निर्णय स्वागतार्ह - नीतेश राणे

कोल्हापूर : संभाजीनगर येथून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी. बसेस पुन्हा मध्यवर्ती बसस्थानकातून (सीबीएस) सोडण्याच्या सूचना आज, सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ताराबाई पार्क येथील सर्किट हाऊस येथे ही बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजाराम माने उपस्थित होते. शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक जानेवारीपासून कोकणातील एस. टी. संभाजीनगर येथून सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये मालवण, सावंतवाडी, पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागत होते. येथून शहरात येण्यासाठी प्रवाशांना १० रुपये ते ८० रुपये आर्थिक भुर्दंड बसत होता. त्यामुळे हा निर्णय बदलावा अन्यथा १५ जानेवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला होता. त्याचबरोबर अनेक प्रवासीही हा निर्णय बदला, अशी मागणी करत होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आज महामंडळाचे कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथून गाड्या सोडाव्यात, अशा सूचना दिल्या. त्यामुळे कोकणातील दहा गाड्या आता संभाजीनगर बसस्थानक येथे न थांबता मध्यवर्ती बसस्थानक येथे येतील, पुन्हा येथूनच कोकणात जातील. या गाड्या संभाजीनगर बसस्थानक ावरून रिंगरोड, सायबर चौक, विद्यापीठ कॉर्नर, मिलिटरी कँटिन, रेल्वे फाटक, ताराराणी चौकामार्गे मध्यवर्ती बसस्थानकात येतील व याच मार्गने पुन्हा संभाजीनगर स्टँड येथून कोकणात जातील. बैठकीस विभाग नियंत्रक सुहास जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी पी. व्ही. पाऊसकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी. गाड्या पुन्हा मुख्य बसस्थानकात नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. येथील जनतेच्या हितासाठी आंदोलन करण्याबरोबरच कोणत्याही स्तरावर जाण्याची आपली तयारी आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी या समस्येबाबत आपण सोमवारी बोललो होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेवर होणारा अन्याय कधीही खपवून घेणार नाही. इतर जिल्ह्यातील जनतेला जो न्याय दिला जाईल, तोच न्याय येथील जनतेला मिळायला हवा. भविष्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहे. - नीतेश राणे, आमदार