राम मगदूम
गडहिंग्लज :
कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षी अनेक दिवस एस.टी.चे चाक फिरलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला तब्बल २४० कोटींचा फटका बसला. प्रवासी संख्येत सुमारे १० कोटींनी घट झाल्यामुळे उत्पन्नात ६७ टक्क्यांनी घट झाली.
२०१९-२० मध्ये दररोज ६९९ बसेस एकूण ९ कोटी २१ लाख ५७ हजार किलोमीटर धावल्या. एकूण १३ कोटी ४३ लाख ९४ हजार प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून ३५६ कोटी ३० लाख २८ हजार उत्पन्न मिळाले होते.
२०२०-२१ मध्ये दररोज ३०० बसेस एकूण ३ कोटी ७५ लाख ६५ हजार किलोमीटर धावल्या. एकूण ३ कोटी ६४ लाख २७ हजार प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून ११६ कोटी ८७ लाख ९० हजार इतके उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत एकूण किलोमीटरमध्ये ५९ टक्के, तर प्रवासी संख्येत ७२ टक्क्यांनी घट झाली.
-------------------------------
* मालवाहतुकीतून मिळाले २ कोटी ७९ लाख
१ जून ते ३१ मार्चअखेर ७ लाख १ हजार २९४ किलोमीटरच्या मालवाहतुकीतून २ कोटी ७९ लाख ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले.
-------------------------------
* प्रतिक्रिया
कोल्हापूरच्या प्रवाशांचे एसटीवर खूप प्रेम आहे; परंतु गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर खूपच मर्यादा आल्या. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसंदर्भातील शासकीय निर्बंध आणि प्रवाशांची मागणी विचारात घेऊन टप्प्याट्प्प्याने वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान टळले. तरीदेखील एकंदरीत प्रवासी संख्या सुमारे १० कोटींनी घटल्यामुळे कोल्हापूर विभागाला मोठा फटका बसला.
- रोहन पलंगे, विभागीय नियंत्रक, कोल्हापूर.
-------------------------------
फोटो ओळी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाची इमारत.
१२०४२०२१-गड-०२
-------------------------------
* सदर बातमीसाठी आकडेवारीचा तक्का (क्यूएसडी) फाईलने (जे यूजर कोलवर - १२ गड फाईल) नावाने पाठविली आहे.