शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारवेळा स्मरणपत्रे तरीही कोल्हापूरची हद्दवाढ अजून जाग्यावरच, पालकमंत्र्यांना पडला विसर 

By भारत चव्हाण | Updated: July 13, 2023 13:17 IST

शासनाच्या मनात आले तर एका रात्रीत हद्दवाढीचा निर्णय होईल. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारसारखेच यांनीही हद्दवाढीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले

भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरातील विकासाला मोठा हातभार लावण्यासाठी महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र वाढवावे, या मागणीचा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्य सरकारला विसर पडला आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हद्दवाढीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत नको असलेले कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण लादले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने तर हा विषय जवळपास संपविल्यासारखाच होऊन गेला आहे.कोल्हापूर शहर नागरी कृती समितीने गेल्या चार महिन्यांत पालकमंत्री केसरकर यांना चार पत्रे पाठविली, परंतु त्याची साधी दखल घेतली नाही, की त्या पत्रांना उत्तर देण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. यावरूनच या प्रश्नाबाबतचे सरकार दरबारी असलेले गांभीर्य लक्षात आले आहे. पालकमंत्री तसेच सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे कोल्हापूरकरांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नगरविकास मंत्री असताना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीची मागणी केली होती. त्या वेळी सुधारित प्रस्ताव तातडीने द्यावा, अशा सूचना शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने २०१७ साली महापालिका सभागृहात झालेला ठरावासह प्रस्ताव पाठविला. सुदैवाने तत्कालीन नगरविकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे हद्दवाढीच्या मागणीची आठवण राहिलेली नाही.कोल्हापूरला सातत्याने येणारे पालकमंत्री केसरकर यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घालून देतो, मुंबईत या, तोपर्यंत आम्ही अभ्यास करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यांनाही आता हद्दवाढीचा विसर पडलेला आहे. ना बैठक ना मुख्यमंत्र्यांची भेट झाली. राज्यातील सत्तासंघर्षात सगळे व्यस्त आहेत. नागरिकांच्या प्रश्नाबाबत कोणाला भान राहिलेले नाही.हद्दवाढीचा विषय आमदार जयश्री जाधव यांनी विधानसभेत विचारला. त्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर भलतेच उत्तर देऊन या प्रश्नाची बोळवण केली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आल्यामुळे आत्ता यावर निर्णय घेता येणे शक्य नाही, मात्र निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक विचार करुन या प्रश्नाची तड लावेल, असे सांगून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली. त्यांनी जे कारण सांगितले त्या महापालिकेच्या निवडणुकीचा अद्याप पत्ताच नाही. शासनाच्या मनात आले तर एका रात्रीत हद्दवाढीचा निर्णय होईल. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारसारखेच यांनीही हद्दवाढीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर