शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चारवेळा स्मरणपत्रे तरीही कोल्हापूरची हद्दवाढ अजून जाग्यावरच, पालकमंत्र्यांना पडला विसर 

By भारत चव्हाण | Updated: July 13, 2023 13:17 IST

शासनाच्या मनात आले तर एका रात्रीत हद्दवाढीचा निर्णय होईल. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारसारखेच यांनीही हद्दवाढीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले

भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरातील विकासाला मोठा हातभार लावण्यासाठी महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र वाढवावे, या मागणीचा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्य सरकारला विसर पडला आहे. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हद्दवाढीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत नको असलेले कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण लादले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने तर हा विषय जवळपास संपविल्यासारखाच होऊन गेला आहे.कोल्हापूर शहर नागरी कृती समितीने गेल्या चार महिन्यांत पालकमंत्री केसरकर यांना चार पत्रे पाठविली, परंतु त्याची साधी दखल घेतली नाही, की त्या पत्रांना उत्तर देण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. यावरूनच या प्रश्नाबाबतचे सरकार दरबारी असलेले गांभीर्य लक्षात आले आहे. पालकमंत्री तसेच सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे कोल्हापूरकरांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नगरविकास मंत्री असताना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीची मागणी केली होती. त्या वेळी सुधारित प्रस्ताव तातडीने द्यावा, अशा सूचना शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने २०१७ साली महापालिका सभागृहात झालेला ठरावासह प्रस्ताव पाठविला. सुदैवाने तत्कालीन नगरविकास मंत्री असणारे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे हद्दवाढीच्या मागणीची आठवण राहिलेली नाही.कोल्हापूरला सातत्याने येणारे पालकमंत्री केसरकर यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घालून देतो, मुंबईत या, तोपर्यंत आम्ही अभ्यास करतो, असे सांगून वेळ मारून नेली. त्यांनाही आता हद्दवाढीचा विसर पडलेला आहे. ना बैठक ना मुख्यमंत्र्यांची भेट झाली. राज्यातील सत्तासंघर्षात सगळे व्यस्त आहेत. नागरिकांच्या प्रश्नाबाबत कोणाला भान राहिलेले नाही.हद्दवाढीचा विषय आमदार जयश्री जाधव यांनी विधानसभेत विचारला. त्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर भलतेच उत्तर देऊन या प्रश्नाची बोळवण केली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आल्यामुळे आत्ता यावर निर्णय घेता येणे शक्य नाही, मात्र निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकार सकारात्मक विचार करुन या प्रश्नाची तड लावेल, असे सांगून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली. त्यांनी जे कारण सांगितले त्या महापालिकेच्या निवडणुकीचा अद्याप पत्ताच नाही. शासनाच्या मनात आले तर एका रात्रीत हद्दवाढीचा निर्णय होईल. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारसारखेच यांनीही हद्दवाढीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर