शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:18 IST

कोल्हापूर : वाढत्या पेट्रोल दरवाढ आणि प्रदूषणावर रामबाण उपाय म्हणून नागरिकांचा पेट्रोलवरील दुचाकी व चारचाकीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहने ...

कोल्हापूर : वाढत्या पेट्रोल दरवाढ आणि प्रदूषणावर रामबाण उपाय म्हणून नागरिकांचा पेट्रोलवरील दुचाकी व चारचाकीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे कल वाढू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत नऊ चारचाकी व सहा र्ई-रिक्षा आणि ३४१ इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. उत्पादकांना सवलती व वाहन खरेदी करताना प्रोत्साहनपर सवलत जाहीर केले आहे. यात १० टक्के वाहने ही इंधनाशिवाय एसीसी बॅटरीवर चालणारी उत्पादित करणे, चार्जिंगसाठी विविध ठिकाणी केंद्र स्थापन करणे, याच वाहनांचे रिसायकलिंग मटेरियल मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, आदी बाबी सरकार करणार आहेत. तत्पूर्वी कोल्हापूरकरांनी खिशाला न परवडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला कंटाळून इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत ३४१ दुचाकी, तर ९ चारचाकी या बॅटरीवर चार्ज होऊन चालणाऱ्या खरेदी केल्या आहेत. वाहन खरेदी करताना सरकारने सवलत जाहीर केली आहे. वापरानंतर त्या मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत पेट्रोल, डिझेलवर धावणाऱ्या दुचाकी, चारचाकीसह इलेक्ट्रिक वाहनांचाही १० टक्के इतका वाटा वाढणार आहे.

बॅटरीसह पूरक उत्पादनांनाही मिळणार प्रोत्साहन

इलेक्ट्रिक वाहनांचा आत्मा बॅटरी असतो. त्यामुळे बॅटरी उत्पादक कंपन्यांना सरकारने प्रोत्साहन जाहीर केले आहे. तर कंपन्यांनीही विक्री झालेल्या वाहनांना ५० हजार कि.मी अथवा तीन वर्षांची वाॅरंटी दिली आहे. बॅटरीसाठी लागणारे रसायन, पूरक साहित्य अशा कंपन्यांची संख्या वाढणार असून, रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे जाणकार सांगत आहेत.

दोन वर्षांतील ई-वाहनांची आकडेवारी अशी...

२०२० - मोटारसायकल - २०९, चारचाकी -०१, ई-रिक्षा - ६

२०२१- मोटारसायकल - १३२, चारचाकी - ८

कोट

राज्य शासनाने इलेक्ट्राॅनिक धोरण जाहीर केले आहे. न परवडणारी इंधन दरवाढ आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने चांगला पर्याय आहे. त्यामुळे अशी वाहने खरेदीकडे लोकांचाही कल वाढू लागला आहे. - डाॅ. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर