शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

कोल्हापूर ‘झेडपी’ नंबर वन

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

सलग दुसऱ्यांदा मान : उत्तूर ग्रामपंचायत तृतीय

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद’ म्हणून राज्यात सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषदेने (झेडपी) ‘नंबर वन’ मिळविला. ग्रामपंचायत गटातून उत्तूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढून हा निकाल मंगळवारी जाहीर केला.केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू केली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. प्रशासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासणी केली जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. २०१५-१६ या वर्षासाठी राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे ८ फेब्रुवारीला मूल्यमापन करण्यात आले होते. दरम्यान, प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदेस २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तिसरा क्रमांक आलेल्या उत्तूर ग्रामपंचायतीस तीन लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी दि. २० मार्चला जाहीर कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांच्याय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि सर्वच खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. (वार्ताहर)शवंत पंचायत राज अभियानाचा निकाल जाहीरसर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याने जिल्हा परिषद दुसऱ्यांदा ‘नंबर वन’ बनल्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकिक वाढला आहे.- विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषदसुरुवातीपासूनच नियोजनबद्ध काम केले. सर्वांच्या सहकार्याने ५० हून अधिक निकष पूर्ण केल्याने सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुढील वर्षीही पहिला क्रमांक मिळवू आणि हॅट्ट्रिक करू.- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारीकेंद्रीय स्पर्धेसाठी पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिला क्रमांक मिळवून केंद्रस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीचे पारितोषिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. गेल्या वर्षी केंद्राचेही पारितोषिक मिळाले होते.