शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘झेडपी’ नंबर वन

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

सलग दुसऱ्यांदा मान : उत्तूर ग्रामपंचायत तृतीय

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद’ म्हणून राज्यात सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषदेने (झेडपी) ‘नंबर वन’ मिळविला. ग्रामपंचायत गटातून उत्तूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढून हा निकाल मंगळवारी जाहीर केला.केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू केली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. प्रशासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासणी केली जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. २०१५-१६ या वर्षासाठी राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे ८ फेब्रुवारीला मूल्यमापन करण्यात आले होते. दरम्यान, प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदेस २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तिसरा क्रमांक आलेल्या उत्तूर ग्रामपंचायतीस तीन लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी दि. २० मार्चला जाहीर कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांच्याय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि सर्वच खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. (वार्ताहर)शवंत पंचायत राज अभियानाचा निकाल जाहीरसर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याने जिल्हा परिषद दुसऱ्यांदा ‘नंबर वन’ बनल्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकिक वाढला आहे.- विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषदसुरुवातीपासूनच नियोजनबद्ध काम केले. सर्वांच्या सहकार्याने ५० हून अधिक निकष पूर्ण केल्याने सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुढील वर्षीही पहिला क्रमांक मिळवू आणि हॅट्ट्रिक करू.- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारीकेंद्रीय स्पर्धेसाठी पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिला क्रमांक मिळवून केंद्रस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीचे पारितोषिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. गेल्या वर्षी केंद्राचेही पारितोषिक मिळाले होते.