शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

कोल्हापूर ‘झेडपी’ नंबर वन

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

सलग दुसऱ्यांदा मान : उत्तूर ग्रामपंचायत तृतीय

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद’ म्हणून राज्यात सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा परिषदेने (झेडपी) ‘नंबर वन’ मिळविला. ग्रामपंचायत गटातून उत्तूर (ता. आजरा) ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. ग्रामविकास विभागाने शासन आदेश काढून हा निकाल मंगळवारी जाहीर केला.केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू केली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. प्रशासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपासणी केली जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. २०१५-१६ या वर्षासाठी राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे ८ फेब्रुवारीला मूल्यमापन करण्यात आले होते. दरम्यान, प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा परिषदेस २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तिसरा क्रमांक आलेल्या उत्तूर ग्रामपंचायतीस तीन लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी दि. २० मार्चला जाहीर कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांच्याय मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि सर्वच खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. (वार्ताहर)शवंत पंचायत राज अभियानाचा निकाल जाहीरसर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याने जिल्हा परिषद दुसऱ्यांदा ‘नंबर वन’ बनल्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यात नावलौकिक वाढला आहे.- विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषदसुरुवातीपासूनच नियोजनबद्ध काम केले. सर्वांच्या सहकार्याने ५० हून अधिक निकष पूर्ण केल्याने सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुढील वर्षीही पहिला क्रमांक मिळवू आणि हॅट्ट्रिक करू.- अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारीकेंद्रीय स्पर्धेसाठी पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिला क्रमांक मिळवून केंद्रस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीचे पारितोषिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. गेल्या वर्षी केंद्राचेही पारितोषिक मिळाले होते.