शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:02 IST

केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देसहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीचहसन मुश्रीफ यांचे आवाहन : बूथ कमिटी संकल्प मेळावा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राफेड विमान खरेदी मधील घोटाळा हा ‘बोफोर्स’ पेक्षा मोठा असून येत्या काही दिवसात देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजप सरकारला याबाबत जाब विचारेल. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे तोंड उघडेल. समाजात कमालीची अस्वस्थता आहे, युवकांची जबाबदारी वाढली असून सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन जनजागृती करा.युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सहकार, शिक्षणासह सर्वच क्षेत्राच्या मूळावर उठलेल्या सरकारला घालवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी. सोशल मिडियावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेली चिखलफेक खपवून घेऊ नका.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, बूथ कमिटीच्या कामात जिल्ह आघाडी राहिला असून दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांना बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. माजी खासदार निवेदिता माने, सरचिटणीस अनिल साळोखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.

युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संगीता खाडे, मधूकर जांभळे, गणपतराव फराकटे, नितीन जांभळे, शिवानंद माळी आदी उपस्थित होते.

वाजपेयी- गांधी यांच्या पैलूचे ‘लोकमत’मुळे समोरदिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मेळाव्यात आदरांजली वाहण्यात आली. अजातशत्रू व्यक्तीमत्व हरपल्याचे निवेदिता माने यांनी सांगितले. ‘लोकमत’ने वाजपेयी यांच्या निधनानंतर प्रसिध्द केलेल्या अंकात विविध विषयांना स्पर्श केला.

राजीव गांधींनी त्यांना केलेली मदत आणि त्याविषयी वाजपेयी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता यातून दोन मोठ्या पक्षांतील नेत्यांमधील वैयक्तीक संबधांचा वेगळा पैलूचे दर्शन झाल्याचे मुश्रीफ यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर