शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:02 IST

केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देसहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीचहसन मुश्रीफ यांचे आवाहन : बूथ कमिटी संकल्प मेळावा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राफेड विमान खरेदी मधील घोटाळा हा ‘बोफोर्स’ पेक्षा मोठा असून येत्या काही दिवसात देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजप सरकारला याबाबत जाब विचारेल. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे तोंड उघडेल. समाजात कमालीची अस्वस्थता आहे, युवकांची जबाबदारी वाढली असून सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन जनजागृती करा.युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सहकार, शिक्षणासह सर्वच क्षेत्राच्या मूळावर उठलेल्या सरकारला घालवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी. सोशल मिडियावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेली चिखलफेक खपवून घेऊ नका.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, बूथ कमिटीच्या कामात जिल्ह आघाडी राहिला असून दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांना बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. माजी खासदार निवेदिता माने, सरचिटणीस अनिल साळोखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.

युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संगीता खाडे, मधूकर जांभळे, गणपतराव फराकटे, नितीन जांभळे, शिवानंद माळी आदी उपस्थित होते.

वाजपेयी- गांधी यांच्या पैलूचे ‘लोकमत’मुळे समोरदिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मेळाव्यात आदरांजली वाहण्यात आली. अजातशत्रू व्यक्तीमत्व हरपल्याचे निवेदिता माने यांनी सांगितले. ‘लोकमत’ने वाजपेयी यांच्या निधनानंतर प्रसिध्द केलेल्या अंकात विविध विषयांना स्पर्श केला.

राजीव गांधींनी त्यांना केलेली मदत आणि त्याविषयी वाजपेयी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता यातून दोन मोठ्या पक्षांतील नेत्यांमधील वैयक्तीक संबधांचा वेगळा पैलूचे दर्शन झाल्याचे मुश्रीफ यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर