शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : सहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीच : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:02 IST

केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देसहा महिने पक्षासाठी काम करा सत्ता आपलीचहसन मुश्रीफ यांचे आवाहन : बूथ कमिटी संकल्प मेळावा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित बूथ कमिटी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राफेड विमान खरेदी मधील घोटाळा हा ‘बोफोर्स’ पेक्षा मोठा असून येत्या काही दिवसात देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजप सरकारला याबाबत जाब विचारेल. त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे तोंड उघडेल. समाजात कमालीची अस्वस्थता आहे, युवकांची जबाबदारी वाढली असून सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन जनजागृती करा.युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार सूडाचे राजकारण करत आहे. सहकार, शिक्षणासह सर्वच क्षेत्राच्या मूळावर उठलेल्या सरकारला घालवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी. सोशल मिडियावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सुरू असलेली चिखलफेक खपवून घेऊ नका.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, बूथ कमिटीच्या कामात जिल्ह आघाडी राहिला असून दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांना बसवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. माजी खासदार निवेदिता माने, सरचिटणीस अनिल साळोखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.

युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, संगीता खाडे, मधूकर जांभळे, गणपतराव फराकटे, नितीन जांभळे, शिवानंद माळी आदी उपस्थित होते.

वाजपेयी- गांधी यांच्या पैलूचे ‘लोकमत’मुळे समोरदिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मेळाव्यात आदरांजली वाहण्यात आली. अजातशत्रू व्यक्तीमत्व हरपल्याचे निवेदिता माने यांनी सांगितले. ‘लोकमत’ने वाजपेयी यांच्या निधनानंतर प्रसिध्द केलेल्या अंकात विविध विषयांना स्पर्श केला.

राजीव गांधींनी त्यांना केलेली मदत आणि त्याविषयी वाजपेयी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता यातून दोन मोठ्या पक्षांतील नेत्यांमधील वैयक्तीक संबधांचा वेगळा पैलूचे दर्शन झाल्याचे मुश्रीफ यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर