शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:23 IST

पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देशिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?दोन महिन्यांपासून लोखंडी कुंपन; देखभालीकडे दुर्लक्ष

सचिन भोसलेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापूरचे वैभव असणाºया या मैदानात विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, अजित वाडेकर, कपिल देव, हनुमंतसिंग, सुनील गावस्कर, विश्वनाथ, सलीम दुराणी, फारूक इंजिनिअर, मन्सूर अली पतौडी, पांडुरंग साळगावकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा ते क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, महंमद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, संजय मांजरेकर यांच्यापासून ते अगदी आता भारतीय संघातून प्रतिनिधित्व करणारा सुरैश रैना अशा एक ना अनेक दिग्गजांनी सामन्यादरम्यान आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन याच खेळपट्टीवर केले आहे.

यात रणजी ते आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणीचे सामनेही याच मैदानात झाले आहेत. यासह स्थानिकांतून महाराष्ट्राला रणजीपटूही याच मैदानाने दिले आहेत. यात रमेश हजारे, मिलिंद कुलकर्णी, सचिन उपाध्ये, नंदकुमार बामणे, रमेश कदम, सदा पाटील, संग्राम अतितकर, आदींचा समावेश आहे.

ही बाब आजच्या पिढीतील खेळाडूंना कदाचित पटणारही नाही; कारण या मैदानाची आजची दुर्दशा त्याला कारणीभूत ठरली आहे. ही दुर्दशा रोखण्यासाठी मैदानाचा आत्मा असणारी खेळपट्टी पूर्ववत व्हावी, अशी मागणी क्रिकेटपटूंकडून होत आहे.१९७१ - सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र (रणजी) पॉली उम्रीगर गौरवार्थ सामना, १९७८ - चंदू बोर्डे गौरव सामना, १९७९- महाराष्ट्र-बडोदा (रणजी), १९८२ - मुंबई- पश्चिम विभागीय संघ, पश्चिम विभागीय भारतीय संघ विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८६- २५ वर्षांखालील भारत-श्रीलंका यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८८- जिल्हा युवा संघ विरुद्ध इंग्लडचा आर्डब्ले, १९९०- इंग्लंडमधील ससेक्स कौंटी संघ विरुद्ध जिल्हा युवा संघ, १० एप्रिल १९९०- विल्स क्रिकेट संघ- महाराष्ट्र, पांडुरंग साळगावकर गौरव सामना, १९९१- बडोदा- महाराष्ट्र (पश्चिम विभागीय स्पर्धा), १९९२ - ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या गौरवार्थ सामना, १९९४- विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांच्या गौरवार्थ सामना, २००१- मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (रणजी), २००५- महाराष्ट्र-उत्तरप्रदेश (रणजी), २००६- महाराष्ट्र -पंजाब (रणजी), आदी सामने या खेळपट्टीवर झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून खेळपट्टीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे एकही सामना झाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून केवळ खेळपट्टीला लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, कार्यवाही काहीच नाही. त्यामुळे ही खेळपट्टी पुन्हा होईल की नाही, याबाबत क्रिकेटपटूंना शंका आहे. 

देशातील अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानावरील खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आहे. याच मुशीतून कोल्हापूरचे अनेक क्रिकेटपटूही राज्यासह देशालाही दिले आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी क्रीडा कार्यालयाने लवकर पूर्ववत करावी.- नंदकुमार बामणे, माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू

 

 

 

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर