शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अठरा गावे, दोन औद्योगिक वसाहतींसह होणार कोल्हापूरची हद्दवाढ, निर्णयाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 11:20 IST

सन २०१७ पासून आतापर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची माहिती, महानगरपालिका सदस्य संख्या यासंदर्भातील माहिती शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविली. शहराची २०१७ पासून आतापर्यंत कोणतीही हद्दवाढ झालेली नसली तरी गेल्या अनेक वर्षांपासून शहराची हद्दवाढ व्हावी, अशी मागणी होत असल्याचे नमूद करून १८ गावे तसेच शिरोली व गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीसह यापूर्वीदेखील प्रस्ताव पाठविल्याचे महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून राज्यातील सर्वच महानगरपालिका नगरपंचायती, नगर परिषदा यांना परिपत्रक पाठवून सन २०१७ पासून आतापर्यंत शहराची हद्दवाढ झाली असल्यास तसेच हद्दवाढ होऊनही नंतर त्या शहराचे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर झाले असल्यास त्याची माहिती, तसेच २०१७ सालाप्रमाणे निर्वाचित सदस्यांची संख्या याबाबतची माहिती मागविली होती.

शहराच्या हद्दवाढीचा विषय हा महानगरपालिकेच्या नगररचना विभागाशी, तर निर्वाचित सदस्य संख्या हा निवडणूक विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे उपायुक्त रविकांत आडसुळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर या तिघांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली. नंतर तिघांनी एकत्रित बसून यासंबंधीच्या माहितीचा अहवाल तयार केला. तो नगरविकास विभागाकडे पाठविला.

सन २०१७ पासून आतापर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. नगरपालिकेचे रूपांतर झाल्यापासून महानगरपालिकेत हद्दवाढ करण्याची मागणी होत आहे; परंतु गेल्या पन्नास वर्षांत शहराची हद्दवाढ झालेली नाही. महानगरपालिकेने याआधीसुद्धा १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींचा प्रस्ताव पाठविला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोबत हा अठरा गावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा पाठविला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१५ मध्ये झाली असून त्यावेळी सभागृहात ८१ सदस्य संख्या होती, असेही नगरविकास विभागाला कळविले आहे. ही माहिती नेमकी कोणत्या कारणासाठी मागविली याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नाही. त्यांनी ज्या प्रकारची माहिती मागविली ती पाठवून देण्यात आली असल्याचे उपायुक्त आडसूळ यांनी सांगितले.

दक्षिणचा अडथळा दूर...

  • कोल्हापूरची हद्दवाढ होण्यात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण आडवे येत होते. या मतदारसंघातील शहराशेजारच्या गावांना शहरात यायचे नाही. त्यामुळे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व युती शासनाच्या काळात भाजपचे आमदार अमल महाडिक यांनीही हद्दवाढीसाठी फारसा रेटा लावला नाही.
  • आता हद्दवाढीसाठी उत्सुक असलेले नगरविकासमंत्री हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आमदार पाटील व महाडिक गटाचीही भूमिका हद्दवाढीस पूरक झाली आहे. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला तर हद्दवाढ होऊ शकते; परंतु गावांची संख्या जास्त व औद्योगिक वसाहतींचे ओझे महापालिका का उचलत आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर