शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:08 IST

सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.

ठळक मुद्देकॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायबओला कचरा डंपीग करणार कोठे?

कोल्हापूर : लाईनबाजार परिसरातील झुम प्रकल्पावर साचलेल्या तीन ते चार लाख टन कचऱ्यावर कॅपींग करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाच्या विचाराधिन असला तरी भविष्यकाळाचा विचार करता परवडणारा नाही. सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कचरा लाईनबाजार येथील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दिवसे दिवस कचऱ्याचा पश्न गंभीर बनला आहे. रोज सरासरी १८० ते २०० टन कचरा लाईन बाजार परिसरात नेऊन टाकला जातो. त्यामुळे कित्तेक मिटर उंचीचे डोंगर तयार झाले आहेत.

सुमारे पाच एकर परिसरात असलेला हा कचरा डेपो आता पूर्णपणे भरलेला आहे. या कचऱ्यात खरमाती, दगडधोंडे राहिले असल्याने त्या विघटन होणे शक्य नाही. हा अविघटनशील कचरा शहरानजिकच्या खणीतून टाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला.परंतु त्याला विरोध होत राहिल्याने कचऱ्याचा पश्न गेल्या तीन वर्षात अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.टोप येथील खण तसेच टाकळा येथील खण महापालिकेच्या ताब्यात आहे. लाईनबाजार येथील अविघटनशील कचरा टोप किंवा टाकळा येथील खणीत नेऊन टाकण्याचा खर्च वाढलेला आहे. मध्यंतर प्रशासनाने किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज घेतला असता साधारणपणे १७ ते १८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे वित्त आयोगातून निधी द्यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठविला.त्यावेळी मंत्रालयात चर्चा झाली. कचऱ्याच्या वाहतुकीवर एवढा खर्च करण्यापेक्षा आहे त्याच जागेवर कॅपींग करा, तुलनेने कमी म्हणजे ८ ते ९ कोटी रुपयांचा खर्च येऊ शकेल असा पर्याय शासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला. त्यामुळे कॅपींगचा प्रस्ताव प्राधान्याने पुढे आला आहे.विशिष्ट प्रावरण अंथरुण या कचऱ्यावर कॅपींग केले जाणार आहे. त्यामुळे कचरा जागेवरुन हलणार नाही. तेथेच डोंगर उभे राहणार आहेत. शिवाय ही जागा गायब होणार आहे. जर कॅपींग केले तर नव्याने येणारा कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण होणार आहे. खर्च कमी होतो

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर