शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कोल्हापूर : कॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायब, ओला कचरा डंपीग करणार कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:08 IST

सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.

ठळक मुद्देकॅपिंगमुळे पाच एकर जागा होणार गायबओला कचरा डंपीग करणार कोठे?

कोल्हापूर : लाईनबाजार परिसरातील झुम प्रकल्पावर साचलेल्या तीन ते चार लाख टन कचऱ्यावर कॅपींग करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाच्या विचाराधिन असला तरी भविष्यकाळाचा विचार करता परवडणारा नाही. सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्कीच आहे.गेल्या अनेक वर्षापासून शहरातील कचरा लाईनबाजार येथील डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. सध्या घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दिवसे दिवस कचऱ्याचा पश्न गंभीर बनला आहे. रोज सरासरी १८० ते २०० टन कचरा लाईन बाजार परिसरात नेऊन टाकला जातो. त्यामुळे कित्तेक मिटर उंचीचे डोंगर तयार झाले आहेत.

सुमारे पाच एकर परिसरात असलेला हा कचरा डेपो आता पूर्णपणे भरलेला आहे. या कचऱ्यात खरमाती, दगडधोंडे राहिले असल्याने त्या विघटन होणे शक्य नाही. हा अविघटनशील कचरा शहरानजिकच्या खणीतून टाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला.परंतु त्याला विरोध होत राहिल्याने कचऱ्याचा पश्न गेल्या तीन वर्षात अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.टोप येथील खण तसेच टाकळा येथील खण महापालिकेच्या ताब्यात आहे. लाईनबाजार येथील अविघटनशील कचरा टोप किंवा टाकळा येथील खणीत नेऊन टाकण्याचा खर्च वाढलेला आहे. मध्यंतर प्रशासनाने किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज घेतला असता साधारणपणे १७ ते १८ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे वित्त आयोगातून निधी द्यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाठविला.त्यावेळी मंत्रालयात चर्चा झाली. कचऱ्याच्या वाहतुकीवर एवढा खर्च करण्यापेक्षा आहे त्याच जागेवर कॅपींग करा, तुलनेने कमी म्हणजे ८ ते ९ कोटी रुपयांचा खर्च येऊ शकेल असा पर्याय शासकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिला. त्यामुळे कॅपींगचा प्रस्ताव प्राधान्याने पुढे आला आहे.विशिष्ट प्रावरण अंथरुण या कचऱ्यावर कॅपींग केले जाणार आहे. त्यामुळे कचरा जागेवरुन हलणार नाही. तेथेच डोंगर उभे राहणार आहेत. शिवाय ही जागा गायब होणार आहे. जर कॅपींग केले तर नव्याने येणारा कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण होणार आहे. खर्च कमी होतो

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर