शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

कोल्हापूर :  तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटील, भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:32 IST

जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर : तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटीलभूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती

कोल्हापूर : जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.आमदार पाटील आणि कृषितजज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर’ उपक्रमाचा समारोप सोमवारी दुपारी येथील दसरा चौकामध्ये करण्यात आला. त्यावेळी उल्हास पाटील यांनी हा इशारा दिला.आमदार पाटील म्हणाले, दसरा चौकात गर्दी करणे आमचा हेतू नव्हता. गेल्या काही दिवसात सर्वजण ८६ किलोमीटर चाललो. शाळाशाळांमध्ये भेटी दिल्या. प्रबोधन केले. उदयनराजे भोसले आणि बुधाजीराव मुळीक या दोन आधारांवर हे काम सुरू आहे. सरकार कुणाचे आहे आणि मंत्रीपद कुणाकडे आहे यापेक्षा सुध्दा लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे तो मांडण्याचे काम मी करत आहे. आतापर्यंत २७ केसीस झाल्या आहेत. २८ दिवस कळंबा जेलमध्ये काढली आहेत. त्यामुळे यापुढेही प्रदूषणमुक्तीसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना डॉ. बुधाजीवराव मुळीक म्हणाले, गेले १५ दिवस मी या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पंचगंगेच्या काठावरचा कापड उद्योग हा पर्यावरणपूरक नाही. हे उद्योग नकोत असे लोकांना वाटायला लावू नका. कि त्येक लाख सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. आम्ही प्रबोधन करतच आहोत. मात्र आता याबाबत ठोस काही तरी कार्यवाही व्हावी.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूरवासियांना थेट धरणातील शुध्द पाणी प्यायला पाहिजे. मात्र शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जनतेला सांडपाणी आणि मलमुत्राचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. राजकारण गेलं चुलीत. मात्र या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढावी लागेल.माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, पंचगंगा प्रदूषणाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. म्हणून इचलकरंजी आणि परिसरातील वस्त्रोद्योगाशी संबंधितांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करावी यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे आहेत म्हणूनच पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.

यावेळी गायत्री मुळीक, रजनीताई मगदूम, पराग पाटील, शेखर पाटील, टी. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने,मधुकर पाटील, वसंतराव मुळीक, पृथ्वीराज यादव, मंगल चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू कमल सावंत, रेखा जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

गुरूकडून विद्यार्थ्याकडे निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अविनाश सुभेदार यांच्याकडे पहात हे माझे विद्यार्थी अशी ओळख करून दिली. सुभेदार यांनीही नमस्कार करत डॉ. मुळीक यांचे स्वागत केले. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या गप्पाही यावेळी झाल्या.

धरणातील पाणी आणि पंचगंगेचे पाणीपंचगंगा उगमस्थानावरून ही रॅली दुपारी १२ च्या सुमारास दसरा चौकामध्ये आली. यावेळी एका गाडीवर राधानगरी, काळम्मावाडी, तुळशीसह अन्य धरणातील पाणी भरून ठेवले होते आणि एका कंटेनरमध्ये पंचगंगेचे पिवळसर,अशुध्द पाणी ठेवण्यात आले होते. 

 

टॅग्स :riverनदीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर