शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

कोल्हापूर :  तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटील, भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:32 IST

जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर : तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटीलभूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती

कोल्हापूर : जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल असा खरमरीत इशारा आमदार उल्हास पाटील यांनी दिला.आमदार पाटील आणि कृषितजज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर’ उपक्रमाचा समारोप सोमवारी दुपारी येथील दसरा चौकामध्ये करण्यात आला. त्यावेळी उल्हास पाटील यांनी हा इशारा दिला.आमदार पाटील म्हणाले, दसरा चौकात गर्दी करणे आमचा हेतू नव्हता. गेल्या काही दिवसात सर्वजण ८६ किलोमीटर चाललो. शाळाशाळांमध्ये भेटी दिल्या. प्रबोधन केले. उदयनराजे भोसले आणि बुधाजीराव मुळीक या दोन आधारांवर हे काम सुरू आहे. सरकार कुणाचे आहे आणि मंत्रीपद कुणाकडे आहे यापेक्षा सुध्दा लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे तो मांडण्याचे काम मी करत आहे. आतापर्यंत २७ केसीस झाल्या आहेत. २८ दिवस कळंबा जेलमध्ये काढली आहेत. त्यामुळे यापुढेही प्रदूषणमुक्तीसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना डॉ. बुधाजीवराव मुळीक म्हणाले, गेले १५ दिवस मी या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पंचगंगेच्या काठावरचा कापड उद्योग हा पर्यावरणपूरक नाही. हे उद्योग नकोत असे लोकांना वाटायला लावू नका. कि त्येक लाख सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. आम्ही प्रबोधन करतच आहोत. मात्र आता याबाबत ठोस काही तरी कार्यवाही व्हावी.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूरवासियांना थेट धरणातील शुध्द पाणी प्यायला पाहिजे. मात्र शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील जनतेला सांडपाणी आणि मलमुत्राचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. राजकारण गेलं चुलीत. मात्र या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढावी लागेल.माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, पंचगंगा प्रदूषणाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. म्हणून इचलकरंजी आणि परिसरातील वस्त्रोद्योगाशी संबंधितांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करावी यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे आहेत म्हणूनच पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे.

यावेळी गायत्री मुळीक, रजनीताई मगदूम, पराग पाटील, शेखर पाटील, टी. वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने,मधुकर पाटील, वसंतराव मुळीक, पृथ्वीराज यादव, मंगल चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू कमल सावंत, रेखा जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

गुरूकडून विद्यार्थ्याकडे निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अविनाश सुभेदार यांच्याकडे पहात हे माझे विद्यार्थी अशी ओळख करून दिली. सुभेदार यांनीही नमस्कार करत डॉ. मुळीक यांचे स्वागत केले. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या गप्पाही यावेळी झाल्या.

धरणातील पाणी आणि पंचगंगेचे पाणीपंचगंगा उगमस्थानावरून ही रॅली दुपारी १२ च्या सुमारास दसरा चौकामध्ये आली. यावेळी एका गाडीवर राधानगरी, काळम्मावाडी, तुळशीसह अन्य धरणातील पाणी भरून ठेवले होते आणि एका कंटेनरमध्ये पंचगंगेचे पिवळसर,अशुध्द पाणी ठेवण्यात आले होते. 

 

टॅग्स :riverनदीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर