शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:52 IST

साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकरवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि.स. खांडेकर व्याख्यानमालासाहित्यिक यशवंतराव चव्हाण विषयावर सहदेव चौगुले यांचे विवेचन

कोल्हापूर : साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.करवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत त्यांनी साहित्यिक यशवंतराव चव्हाण या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते.

चौगुले म्हणाले, राजकीय व्यक्तींनी साहित्यात लुडबूड करू नये, असा एक सूर असतो तो यशवंतरावांच्याही काळात होता.  मात्र, भिन्न मार्गांनी चालणारी ही दोन्ही माणसे समाज आणि मानवहित या एकाच उद्देशाने काम करत असतात. किंबहुना अनेक साहित्यिक राजकारणातही तितक्याच मुक्तपणे संचार करत असलेले आपल्याला दिसतात. सावरकर, नेहरू, गदिमा, अटलबिहारी वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, डॉ. राधाकृष्णन अशा अनेक नेत्यांच्या साहित्यकृतीही तितक्याच दर्जेदार आहेत.ते म्हणाले, यशवंतरावांचे राजकीय गुणधर्म त्यांच्या साहित्यातही आढळतात. सामान्यजनांचे हित साधणारे माध्यम म्हणून त्यांनी साहित्याकडे पाहिले. मराठी साहित्यात माझी भूमिका वाचकांची आहे, असे म्हणणाऱ्या यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्य आणि सौंदर्यावर नितांत विश्वास होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला सामाजिक अर्थ आहे.

गेली ४० वर्षे मी यशवंतरावांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या साहित्यात आणि कृतीत प्रत्येकवेळी एक कसलेला राजकारणी साहित्यिकाच्या अंगाने उलगडताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात.

डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित भोसले यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य