शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

कोल्हापूर :‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:06 AM

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान ...

ठळक मुद्दे‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान२०० कर्मचाऱ्यांनी बजावला हक्क : केर्ली शासकीय गोदाम येथे प्रक्रिया

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान झाले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत २०० कर्मचाऱ्यांनी हक्क बजावल्याने १ लाख ६८ हजार इतक्या मतदानाची नोंद झाली.जिल्ह्यातील १0 विधानसभा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची ७३२१ बॅलेट्स व ४२५७ कंट्रोल युनिट्स व ४२५७ व्हीव्हीपॅट मशीन्स प्राप्त झाली आहेत. त्यांच्या प्राथमिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्सचा वापर निवडणुकीत होणार आहे; त्यामुळे या मशीनची चाचणी घेण्यासाठी अभिरूप मतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होेते.त्यानुसार सकाळी ९ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह कॉँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडी, हिंदु महासभा, आदी पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.गोदामात तीन ठिकाणी मांडण्यात आलेल्या टेबलवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे संच ठेवण्यात आले होते. करवीर, कागल येथील कर्मचाऱ्यांवर ८० मशीनची, गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा येथील कर्मचाऱ्यांवर ८० व पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ येथील कर्मचाऱ्यांवर ४० मशीनची जबाबदारी होती.

ईव्हीएम मशीनवरील चिन्हापुढे बोट दाबल्यानंतर झालेल्या मतदानाप्रमाणे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये चिन्हांची चिठ्ठी येत होती व काही क्षणात ती बॉक्समध्ये पडत होती. इव्हीएमवर दाबलेल्या चिन्हाप्रमाणे व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीत चिन्ह आहे का नाही? याची खातरजमा कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.

पहिल्या ८० मशीनवर ८०००० मतदान झाले. या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांने १००० वेळा हक्क बजावला. दुसऱ्या ८० मशीनवर ४०००० मतदान होऊन येथे प्रत्येक कर्मचाऱ्याने ५०० वेळा, तर तिसऱ्या ४० मशीनवर ४८००० मतदान होऊन, प्रत्येक कर्मचाऱ्याने १२०० वेळा बटन दाबले.

‘बेल’ कंपनीच्या अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजून झालेल्या मतदानाची शहानिशा करण्यात आली. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली. मतदान झाल्यानंतर काही प्रतिनिधींनी आम्ही कोणाला मतदान केले आहे, हे कळण्यासाठी चिठ्ठी हवी असल्याचे सांगितले. यावर अधिकाऱ्यांनी तसे निर्देश नसल्याचे सांगितल्यावर. आमच्या सूचना आयोगाकडे कळवाव्यात, असे प्रतिनिधींनी सांगितले.

थर्मल पेपरची चिठ्ठी दहा वर्षे टिकणारव्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या मतदानासाठी असणारी चिठ्ठी ही थर्मल पेपरची असून, त्यावरील शाई इतर चिठ्ठ्यांप्रमाणे उडू शकते, अशी शंका विचारल्यावर बेल कंपनीच्या अधिकाऱ्यानी किमान १0 वर्षे टिकेल, असा हा कागद व शाई असल्याचे सांगितले.

 

 

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीkolhapurकोल्हापूर