शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कोल्हापूर : कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:07 IST

मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळमुंबईच्या जबाबदारीतून मुक्तता; प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा

संतोष मिठारी

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.

जुलै २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी मदत करण्याची सूचना कुलपती कार्यालयाने शिवाजी विद्यापीठाला केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यावर कुलपती कार्यालयाने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी सोपविला. यानंतर गेल्या आठ महिन्यांत मुंबई विद्यापीठातील कामकाजामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांचा अधिकतर वेळ व्यतीत होऊ लागला.

एखादा कार्यक्रम, महत्त्वाच्या विषयांवरील बैठकीपुरतेच शिवाजी विद्यापीठात त्यांचे येणे होऊ लागले. त्याचा परिणाम विद्यापीठातील प्रशासकीय पातळीवरील कामकाजावर झाला. प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीची गती मंदावली. त्यातच गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)च्या मानांकनामध्ये देशातील शंभर विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही.

यावर हे मानांकन घसरण्यास कुलगुरू जबाबदार असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केला. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेने ‘कुलगुरू हरवले’ अशा स्वरूपातील पत्रके विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून निषेध व्यक्त केला.

कुलगुरूंच्या विद्यापीठातील अनुपस्थितीबाबत विविध घटक, संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच कुलगुरू डॉ. शिंदे यांची मुुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होण्याची चर्चा सुरू होती.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची निवड झाल्याने या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाच्या जबाबदारीतून डॉ. शिंदे मुक्त होणार आहेत. त्यामुळे ते शिवाजी विद्यापीठातील कामकाज, विविध घटकांचे प्रलंबित प्रश्न, उपक्रमांना गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘एनआयआरएफ’, ‘नॅक’ची तयारी महत्त्वाचीशिवाजी विद्यापीठाने सन २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळविले. यानंतरच्या वर्षी ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशात २८ वा क्रमांक पटकविला. मात्र, यावर्षी ‘एनआयआरएफ’च्या मानांकनात पहिल्या शंभर संस्थांमध्ये विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही. विद्यापीठ एक वर्षानंतर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्यापूर्वी ‘एनआयआरएफ’चे मानांकन होईल. त्याची विद्यापीठाकडून आतापासून तयारी होणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने कुलगुरूंकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

 

आव्हानात्मक स्थितीमध्ये मुंबई विद्यापीठाची जबाबदारी कुलपतींनी माझ्यावर सोपविली. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कामाच्या वारशामुळे मला ही संधी मिळाली. संवाद, संपर्क व सहभाग या त्रिसूत्रीने काम करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्याचे मला समाधान आहे.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

 

विद्यापीठाचे मानांकन ढासळले आहे. ते वाढविण्याच्या दृष्टीने कुलगुरूंनी आता अधिक जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे. प्रशासन आणि विविध अधिकार मंडळांच्या कामकाजामध्ये त्यांनी लक्ष द्यावे.- सुधाकर मानकर, मार्गदर्शक, ‘सुटा’

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर