शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

कोल्हापूर : कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:07 IST

मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कुलगुरूंना मिळेल आता शिवाजी विद्यापीठासाठी वेळमुंबईच्या जबाबदारीतून मुक्तता; प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा

संतोष मिठारी

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वेळ देता येईल. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासह विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा विद्यापीठातील घटकांतून व्यक्त होत आहे.

जुलै २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी मदत करण्याची सूचना कुलपती कार्यालयाने शिवाजी विद्यापीठाला केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यावर कुलपती कार्यालयाने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी सोपविला. यानंतर गेल्या आठ महिन्यांत मुंबई विद्यापीठातील कामकाजामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांचा अधिकतर वेळ व्यतीत होऊ लागला.

एखादा कार्यक्रम, महत्त्वाच्या विषयांवरील बैठकीपुरतेच शिवाजी विद्यापीठात त्यांचे येणे होऊ लागले. त्याचा परिणाम विद्यापीठातील प्रशासकीय पातळीवरील कामकाजावर झाला. प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीची गती मंदावली. त्यातच गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)च्या मानांकनामध्ये देशातील शंभर विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही.

यावर हे मानांकन घसरण्यास कुलगुरू जबाबदार असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केला. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कोल्हापूर शाखेने ‘कुलगुरू हरवले’ अशा स्वरूपातील पत्रके विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून निषेध व्यक्त केला.

कुलगुरूंच्या विद्यापीठातील अनुपस्थितीबाबत विविध घटक, संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच कुलगुरू डॉ. शिंदे यांची मुुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होण्याची चर्चा सुरू होती.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची निवड झाल्याने या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाच्या जबाबदारीतून डॉ. शिंदे मुक्त होणार आहेत. त्यामुळे ते शिवाजी विद्यापीठातील कामकाज, विविध घटकांचे प्रलंबित प्रश्न, उपक्रमांना गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘एनआयआरएफ’, ‘नॅक’ची तयारी महत्त्वाचीशिवाजी विद्यापीठाने सन २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळविले. यानंतरच्या वर्षी ‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात देशात २८ वा क्रमांक पटकविला. मात्र, यावर्षी ‘एनआयआरएफ’च्या मानांकनात पहिल्या शंभर संस्थांमध्ये विद्यापीठाला स्थान मिळविता आले नाही. विद्यापीठ एक वर्षानंतर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्यापूर्वी ‘एनआयआरएफ’चे मानांकन होईल. त्याची विद्यापीठाकडून आतापासून तयारी होणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने कुलगुरूंकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

 

आव्हानात्मक स्थितीमध्ये मुंबई विद्यापीठाची जबाबदारी कुलपतींनी माझ्यावर सोपविली. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कामाच्या वारशामुळे मला ही संधी मिळाली. संवाद, संपर्क व सहभाग या त्रिसूत्रीने काम करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्याचे मला समाधान आहे.-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

 

विद्यापीठाचे मानांकन ढासळले आहे. ते वाढविण्याच्या दृष्टीने कुलगुरूंनी आता अधिक जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे. प्रशासन आणि विविध अधिकार मंडळांच्या कामकाजामध्ये त्यांनी लक्ष द्यावे.- सुधाकर मानकर, मार्गदर्शक, ‘सुटा’

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर