शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर :भाज्या घसरल्या; साखर उतरली, तूरडाळ वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:53 IST

आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.

ठळक मुद्देभाज्या घसरल्या; साखर उतरली, तूरडाळ वधारली भोगीनिमित्त राळ्याच्या तांदळाला मागणी

कोल्हापूर :  आठवडी बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर घसरले होते; तर दुसरीकडे, साखरेचा न झालेला उठाव, जुनी साखर शिल्लक आणि नवीन साखर बाजारात आल्याने साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. किरकोळ बाजारात साखर ३६ रुपयांवरून ३४ रुपये प्रतिकिलो झाली. फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षे यांची आवक वाढल्याने त्याचे दर उतरले आहेत.सौंदत्ती यात्रा आणि ओढ्यावरची रेणुका यात्रा झाल्याने रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी नव्हती. साधारणत: या आठवड्यात सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे. कोबीचा गड्डा साडेपाच रुपये, वांगी २२ रुपये, ढबू मिरची १५ रुपये, घेवडा, कारली २० रुपये, भेंडी २५ रुपये, दोडका ३२ रुपये, फ्लॉवर १० रुपये, कोथिंबीर १० रुपये पेंढी, हरभरा पेंढी १० रुपये, तर टोमॅटो, ओला वाटाणा, मेथीचे दर स्थिर होते.

रविवारच्या आठवडी बाजारात पिवळीधमक व चवीला गोड अशी पपई आली आहे. तिच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.(छाया : नसीर अत्तार)फळबाजारामध्ये माल्टा, द्राक्षांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. द्राक्षे ३० रुपये प्रतिकिलो, माल्टा ४५० रुपये चुमडे, तर बोरांचा दर स्थिर म्हणजे १२ रुपये किलो होता. याचबरोबर पपई, केळी, चिंच, क ैरी, किवी, टरबूज, रामफळ व स्ट्रॉबेरी यांचे दर ‘जैसे थे’ होते.

काही दिवसांत भोगी सण असल्यामुळे राळ्याच्या तांदळाला बाजारात मागणी वाढू लागली आहे. तो प्रतिकिलो १०० रुपयांच्या घरात गेला आहे. बन्सी गहू २८, आॅलिम्पिक ३४ रुपये, तांदूळ रत्नागिरी ४४ व ५० रुपये, बाजरी एक नंबर २८ रुपये झाली आहे. मात्र गेल्या १० ते १५ दिवसांत तूरडाळीच्या दरात वाढ होत आहे. पूर्वी ती ६८ रुपये होती. ती आता ७६ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ड्रायफु्रटचे दर जैसे थे आहेत.

गूळ स्थिर; कांदा, बटाटा उतरलागेल्या आठवड्यात गुळाच्या रव्याचा बॉक्स ३५ रुपये होता, तोच दर या आठवड्यात होता. तो स्थिर होता; पण कांदा व बटाट्याच्या दरात घसरण झाली आहे. कांदा पाच रुपये, तर बटाटा १० रुपये किलो होता. कांद्यात दोन रुपयांची व बटाट्यामध्ये सात रुपयांची घसरण झाली आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर