शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:40 IST

पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.

ठळक मुद्देपावसाळ्यात विजेबाबत दक्षता आवश्यक, कारणे समजून घ्या पुरवठा खंडित झाल्यास ‘टोल फ्री’ वर चौकशी करा

कोल्हापूर : पारंपरिक किंवा अपारंपरिक स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे (ग्रीड) देशात पसरलेले आहे. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते, असा बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्ही मध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्चदाबामुळे ते जळण्याची शक्यता असते.

दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते. वीज खांबात वीजपुरवठा उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात.

हे इन्सुलेटर उन्ह किंवा वीजप्रवाहामुळे गरम झालेले असतात. त्यातच त्यावर पावसाचे थेंब पडले की, त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो. अन लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होऊन फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो.

जर हा फिडर बंद पडला नाही तर जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते. जेव्हा-केव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, त्यावेळी वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात.

वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. ऊन-वाऱ्याची, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम हाती घेतली जाते. वेळप्रसंगी बंद पडलेल्या वाहिनीचे सर्व खांब चढून तपासावे लागतात तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पुरी यांनी दिली.

वीजपुरवठा खंडित झाल्यास येथे तक्रार करावीजपुरवठा खंडित झाल्यास पाच ते दहा मिनिटे थांबून ‘महावितरण’च्या टोल फ्री क्रमांकाला दूरध्वनी करावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंपनीने १९१२, १८००० २३३ ३४३५ व १८०० १०२ ३४३५ या तीन टोल फ्री क्रमांकाची सुविधा कंपनीने केली आहे.

मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यांमार्फत पोहोचवून त्याचे तातडीने निराकरण केले जाते. ‘महावितरण’च्या मोबाईल अ‍ॅपमधूनही विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविता येतात, अशी माहिती ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.

अशी घ्या दक्षता

  1. * आपल्या घरात ‘ईएसीबी स्वीच’असणे गरजेचे आहे.
  2. * अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
  3. * वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
  4. * वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
  5. * विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
  6. * विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारू नयेत.
  7. * बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.
  8. * विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी.
  9. * नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीज मीटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरण