शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोल्हापूर : शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली : हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:26 IST

कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देशंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा

कोल्हापूर : कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.हिंदू जनजागरण समितीचे मधुकर नाझरे यांनी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानानुसार धर्माचरणाची गरज असल्याचे सांगितले.अ‍ॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, शंकराचार्यांनी पददलितांसाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या कार्यामुळे धर्मांतरे थांबली गेली.शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, आजही हिंदू धर्मावर आक्रमणे चालू आहेत. त्यासाठी शंकराचार्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. अ‍ॅड. केदार मुनिश्वर म्हणाले, शंकराचार्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.शिवसेनेचे संभाजी भोकरे म्हणाले, शंकराचार्यांनी पुढाकार घेऊन धर्मांतरे रोखली. हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी म्हणाले, शंकराचार्यांचे पाठबळ व मार्गदर्शन नेहमीच सर्वांना राहिले आहे. अ‍ॅड. सुधीर जोशी म्हणाले, स्वामीजींनी मठाचे कार्य दलितांसाठी पोहोचवून त्यांच्यासाठी देवालये स्थापन केली.यावेळी भानुदास महाराज, राजू यादव, अशोक रामचंदानी, मयूर तांबे, प्रफुल्ल जोशी, गोविंद देशपांडे, उदय सांगवडेकर, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर