शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस पाच दिवस बेळगाववरून, हजारो प्रवाशांना भुर्दंड

By संदीप आडनाईक | Updated: September 1, 2023 18:57 IST

मिरज-हुबळी, मिरज-कॅन्सरलॉक एक्स्प्रेस रद्द : काही गाड्या सुटणार उशिराने

कोल्हापूर : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील कुडची ते उगार खुर्दच्या दरम्यान मिरज लोंढा दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतल्याने तसेच तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्या उशिराने सुटणार आहेत. याचा फटका भक्तांना बसणार आहे.

हरिप्रिया एक्स्प्रेस पाच दिवस उद्यापासून बेळगाववरून सुटणार आणि पोहोचणार आहे. या मार्गावर कोल्हापुरातून प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटकांना बेळगावपर्यंतचा आणि तेथून परतीच्या मार्गापर्यंतचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस या काळात बेळगाववरून सुटेल आणि तिरुपतीवरून कोल्हापूरला येणारी गाडी बेळगाव येथे थांबविण्यात येईल. मात्र, या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील कुडची ते उगार खुर्दच्या दरम्यान मिरज-लोंढा दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या आहेत. गाडी क्रमांक १७४१५ तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस ३ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरदरम्यान बेळगावपर्यंतच धावेल आणि हीच गाडी क्रमांक १७४१६ या मार्गावर ४ पासून ८ सप्टेंबरदरम्यान बेळगाव येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.

या गाड्या केल्या आहेत रद्दगाडी क्रमांक १७३३१ मिरज-हुबळी एक्स्प्रेस ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान रद्द केली आहे. हीच गाडी क्रमांक १७३३२ याच मार्गावर ४ पासून ८ सप्टेंबरपर्यंत धावणार नाही. गाडी क्रमांक १७३३३ मिरज-कॅन्सरलॉक एक्स्प्रेस ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान रद्द केली आहे. परतीच्या मार्गावर धावणारी ही गाडी क्रमांक १७३३४ ही रद्द केली आहे.

या गाड्या धावणार एक तास उशिरानेगाडी क्रमांक १६५९० मिरज-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ३,४,५ आणि ८ सप्टेंबर रोजी एक तास उशिराने धावणार आहे. तर, १६५४२ पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ही गाडी ८ सप्टेंबर रोजी एक तास उशिराने धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली. या मार्गावरील प्रवाशांनी माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेचे कोल्हापूर स्थानकप्रमुख विजय कुमार यांनी केले आहे. दरम्यान, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यंटकांसाठी या काळात बेळगावहून कोल्हापूरपर्यंत स्वतंत्र बसची मागणी प्रवाशांनी केली आहे.