शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कोल्हापूर : सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:32 IST

गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे.

ठळक मुद्दे सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, नागरिकांत भीतीचे वातावरण गणेशवाडीतील राष्ट्रीयीकृत बँक भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांत भीती पसरली आहे.अधिक माहिती अशी, गणेशवाडी येथील प्रताप चंद्रकांत पाटील यांच्या गाळ्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. शाखाधिकारी सुरेश अशोक देसाई (वय ४४, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) हे शनिवारी, २१ जुलैला चार वाजता बँक बंद करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी रविवारी २२ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास अचानक बँकेचा सायरन वाजला. तो एकसारखा वाजू लागल्याने शेजारील लोकांनी बँकेचा शिपाई एकनाथ माने (रा. गणेशवाडी) यांना फोनवरून माहिती दिली. माने तत्काळ बँकेत आले असता बँकेचे शटर उचकटलेले होते. आतमध्ये लोखंडी पहार पडली होती.

चोरीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक सुरेश देसाई यांना बोलावून घेतले. देसाई यांनी बँकेत येऊन पाहणी केली असता बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज वाकविलेले दिसले. तेथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र बँक बंद असताना शटर उघडल्यानंतर आतमध्ये कोणीही गेले असता सायरन वाजतो. नेमका त्याच वेळी सायरन वाजल्याने चोरट्यांनी लोखंडी पहार जागेवर टाकून पोबारा केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चोरटे दिसून येत नाहीत.

नऊ दिवसांनी फिर्यादचोरीच्या प्रकारानंतर बँकेचे व्यवस्थापक सुरेश देसाई, गणेशवाडी, सावरवाडी आणि बीडशेड येथील पोलीस पाटलांनी करवीर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी ठाणे अंमलदारांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सर्व पोलीस नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेला बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यामुळे तिकडे येण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. तुम्हाला आम्ही फोन केल्यानंतर या, असे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेतली.बावीस लाखांची रोकडबँकेतील तिजोरीत सुमारे २२ लाखांची रोकड होती. त्याचा सुगावा चोरट्यांना लागळा असण्याची शक्यता आहे. भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असताना सायरन वाजल्याने चोरटे लोखंडी पहार जागेवर टाकून पळून गेले. ते आसपासच्या परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर