शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

By विश्वास पाटील | Updated: September 29, 2024 10:26 IST

महायुतीत कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड आणि शिरोळला बंडखोरीचे चिन्हे दिसतात. महाविकास आघाडीत राधानगरी, चंदगडला बंडखोरी थोपवण्याचे आव्हान असेल.

विश्र्वास पाटील -कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीतील कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमहाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवारांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होताना दिसत आहे. साधारणत: १४ ऑक्टोबरला दसऱ्यानंतर निवडणूकीची घोषणा होऊ शकते. १५ किंवा १६ नोव्हेंबरला मतदान झाले तर नवे सभागृह २७ पर्यंत सत्तेत येवू शकते. मतदानानंतर सरकार अस्तित्वात येण्यासाठी दहा दिवस हाती राहतात. साधारणत हाच अंदाज घेवून संभाव्य इच्छुकांनी आपपल्या मतदार संघातील मोर्चेबांधणी व आचारसंहितेच्या अगोदरची कामे पूर्ण करून घेण्यावर सपाटा लावला आहे.

महायुतीत कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड आणि शिरोळला बंडखोरीचे चिन्हे दिसतात. महाविकास आघाडीत राधानगरी, चंदगडला बंडखोरी थोपवण्याचे आव्हान असेल.

निवडणूकीची संभाव्य तारीख पाहता आचारसंहिता लागू होण्यास १६ दिवसच राहतात. त्यामुळे प्रत्येक मतदार संघातील वातावरण कमालीचे तापू लागले आहे. त्यातही कागल, राधानगरी, चंदगड, इचलकरंजीमधील वातावरण अधिकच तापले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवाराची अडचण आली आणि उध्दवसेनेने फारच जोर लावला तर ही जागा त्यांना देवून राधानगरीची जागा काँग्रेसला घेता येवू शकते. उध्दवसेनेकडून संजय पवार यांचा विचार होवू शकतो. 

राधानगरीत के.पी.पाटील यांना उमेदवारी दिल्यास ए.वाय.पाटील यांचे काय करायचे हा मोठा गुंता आहे. ते यावेळेला कोणत्याही स्थितीत लढणारच म्हणून मैदानात उतरले आहेत. या दोघांतील वाद मिटत नाही तोपर्यंत तेथील लढत अटीतटीची होत नाही. चंदगडला शिवाजीराव पाटील, मानसिंग खोराटे यांनी प्रचार सुरु केलाच आहे. अप्पी पाटीलही लढण्याच्या तयारीत आहेत. इचलकरंजीत आता तरी एकास एक लढत द्यायच्या हालचाली सुरु आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाल्यास सत्यजित कदम कोणते पाऊल उचलतात हे महत्वाचे ठरेल. कारण त्यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने ही निवडणूक निर्णायक असेल. तिसऱी आघाडी आकारास आल्यास उमेदवार संख्या आणि दोन्ही पक्षांची डोकेदुखीही वाढेल.

कोल्हापूरातील महायुती व महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवारमतदार संघ                   -                   महायुती                   -                     महाविकास आघाडी

कोल्हापूर उत्तर -                 राजेश क्षीरसागर (शिंदेसेना)   -               काँग्रेस उमेदवाराबद्दल संभ्रमकोल्हापूर दक्षिण -                शौमिका महाडिक (भाजप)    -                  ऋतुराज पाटील (काँग्रेस)

करवीर     -                           चंद्रदिप नरके (शिंदेसेना)       -                   राहूल पाटील (काँग्रेस)राधानगरी   -                       प्रकाश आबिटकर (शिंदेसेना)  -                के.पी.पाटील (उध्दवसेना)

शाहूवाडी    -                           विनय कोरे (जनसुराज्य)     -             सत्यजित पाटील (उध्दवसेना)कागल    -                  हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) -  समरजित घाटगे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)

चंदगड     -                राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) -   डॉ.नंदिनी बाभूळकर (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)हातकणंगले -                अशोकराव माने (जनसुराज्य)                 -           राजूबाबा आवळे (काँग्रेस)

शिरोळ       -               राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)                -              उल्हास पाटील (उध्दवसेना)इचलकरंजी -                      राहूल आवाडे (भाजप)                       -       मदन कारंडे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)

महायुतीतील जागावाटप

शिंदेसेना (एकूण ३) : कोल्हापूर उत्तर,करवीर आणि राधानगरीभाजप (२) : कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी

राष्ट्रवादी अजित पवार पक्ष (२) : कागल, चंदगडजनसुराज्य शक्ती (२): शाहूवाडी, हातकणंगले.

अपक्ष किंवा स्थानिक आघाडी (१) : शिरोळ

महाविकास आघाडीतील जागावाटपकाँग्रेस (४) : कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, आणि हातकणंगले.

उध्दवसेना (३) : राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष (३) : कागल, चंदगड आणि इचलकरंजी

शिरोळमधील गुंता..आमदार राजेंद्र यड्रावकर हे त्यांच्या भावाने स्थापन केलेल्या राजर्षि शाहू आघाडी किंवा अपक्ष म्हणून रिंगणात राहतील अशी चिन्हे आहेत. त्यांना महायुतीने पुरस्कृत केले तर अडचण नाही परंतू त्यांनी युतीशी फारकत घेतली तर या मतदार संघातून गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांची चर्चा नव्याने जोरात सुरु झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवारही तिथे रिंगणात असेल. त्यामुळे गुंतागुंत अधिकच वाढेल. आघाडीतून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांचे नांव पुढे आहे. परंतू काँग्रेसचीच उमेदवारी असेल तरच ते रिंगणात उतरू इच्छितात. आता नाही तर कधीच नाही असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. मध्यममार्गी स्वभाव, वयाचा मुद्दा, फायटिंग स्पिरीट या पातळीवर त्यांच्या उमेदवारीचा कस लागेल.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी