शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कोल्हापूर : टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो, वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीत, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 11:27 IST

वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही.

ठळक मुद्देटोमॅटो दहा रुपयांना दीड किलो वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीतभाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  बाजारात टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस येत असला तरी वातावरणातील उष्मा काही कमी नाही. उष्मा रोज वाढतच जात असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे.

विशेष करून सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या व शरीरास पोषक असणाऱ्या लिंबू सरबताला थोडी जादाच मागणी आहे. त्यामुळे लिंबंूची मागणी वाढली असून आठवड्यात दोन रुपयांवरून पाच रुपयांपर्यंत लिंबू पोहोचला आहे.

फळबाजारात संत्री, सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, कलिंगडांची रेलचेल असून उठावही असल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कलिंगडांची आवक जास्त सुरू असून सरासरी दहा ते वीस रुपये नग असा दर आहे. द्राक्षे ५० रुपये किलो, तर चिक्कू २० पासून ५० रुपये किलोपर्यंत दर आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात वांगी, ढबू २० रुपये किलो, तर गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडका तीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

काकडीची आवकही वाढत आहे. परिणामी दरांत हळूहळू घसरण सुरू असून साधारणत: तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. मेथी, कोथिंबीर, पोकळा, पालकाची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार दिसत नाही.पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुळाला असणारी मागणी थोडी कमी झाली असून साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्य, डाळीचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाट्याचे दर स्थिर असून लसणाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे.

हापूसची आवक वाढलीकोल्हापूर बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज दीड हजार बॉक्स कोकणासह कर्नाटकातून येत आहेत. घाऊक बाजारात सरासरी ७५० रुपये बॉक्स, तर १८०० रुपये पेटीचा दर राहिला आहे.

टोमॅटो दहा रुपयांना दीड किलोटोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार