शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

कोल्हापूर : टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो, वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीत, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 11:27 IST

वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही.

ठळक मुद्देटोमॅटो दहा रुपयांना दीड किलो वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीतभाजीपाल्याच्या दरात घसरण

कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे.  बाजारात टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस येत असला तरी वातावरणातील उष्मा काही कमी नाही. उष्मा रोज वाढतच जात असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे.

विशेष करून सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या व शरीरास पोषक असणाऱ्या लिंबू सरबताला थोडी जादाच मागणी आहे. त्यामुळे लिंबंूची मागणी वाढली असून आठवड्यात दोन रुपयांवरून पाच रुपयांपर्यंत लिंबू पोहोचला आहे.

फळबाजारात संत्री, सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, कलिंगडांची रेलचेल असून उठावही असल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कलिंगडांची आवक जास्त सुरू असून सरासरी दहा ते वीस रुपये नग असा दर आहे. द्राक्षे ५० रुपये किलो, तर चिक्कू २० पासून ५० रुपये किलोपर्यंत दर आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात वांगी, ढबू २० रुपये किलो, तर गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडका तीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

काकडीची आवकही वाढत आहे. परिणामी दरांत हळूहळू घसरण सुरू असून साधारणत: तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. मेथी, कोथिंबीर, पोकळा, पालकाची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार दिसत नाही.पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुळाला असणारी मागणी थोडी कमी झाली असून साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्य, डाळीचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाट्याचे दर स्थिर असून लसणाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे.

हापूसची आवक वाढलीकोल्हापूर बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज दीड हजार बॉक्स कोकणासह कर्नाटकातून येत आहेत. घाऊक बाजारात सरासरी ७५० रुपये बॉक्स, तर १८०० रुपये पेटीचा दर राहिला आहे.

टोमॅटो दहा रुपयांना दीड किलोटोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार