शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

कोल्हापूर : सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी?, प्रदूषण मंडळांकडे १५ हजार संस्थांसाठी दोन क्षेत्र अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:22 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार ५०० औद्योगिक संस्था, चार हजारांपेक्षा अधिक रुग्णालये आणि एक डझन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात केवळ दोन क्षेत्र अधिकारी आहेत. सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी? असा सवाल करीत, तरीही अहवालात दोषी असणाऱ्यांचे वीज व पाणीजोडणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी राज कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देसांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी?प्रदूषण मंडळांकडे १५ हजार संस्थांसाठी दोन क्षेत्र अधिकारी२० लाखांची बॅँक गॅरंटी जप्त!प्रादेशिक कार्यालयाचे अधिकार

कोल्हापूर : जिल्ह्यातील ११ हजार ५०० औद्योगिक संस्था, चार हजारांपेक्षा अधिक रुग्णालये आणि एक डझन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात केवळ दोन क्षेत्र अधिकारी आहेत. सांगा, आम्ही कारवाई करायची तरी कशी? असा सवाल करीत, तरीही अहवालात दोषी असणाऱ्यांचे वीज व पाणीजोडणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी राज कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पंचगंगा प्रदूषणावरून शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाकिटे घेऊन प्रदूषण करणाऱ्यांवर जुजबी कारवाई होत असल्याने या कार्यालयाचा धाकच राहिला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

याबाबत उपप्रादेशिक अधिकारी राज कामत यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, शिवसेनेने पाकीट घेऊन कारवाई टाळत असल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. असे कोणतेही काम येथे केले जात नाही.

मुळात जिल्ह्यात औद्योगिक, रुग्णालये, महापालिका व नगरपालिका अशा पंधरा हजार संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची तपासणी करण्याचे काम क्षेत्र अधिकारी करतात.

वर्षापूर्वी सहा क्षेत्र अधिकारी होते. आता केवळ दोन आहेत. तरीही आम्ही तक्रारींची वाट न पाहता मंडळाच्या धोरणानुसार दर महिन्याला भेट देऊन तपासणी करीत असतो.

२० लाखांची बॅँक गॅरंटी जप्त!प्रदूषण मंडळ कारवाई करीतच नाही, असे नाही. गेल्या वर्षभरात दालमिया साखर कारखान्याने प्रदूषण केल्याप्रकरणी त्यांची २० लाखांची बॅँक गॅरंटी जप्त केली. त्याच्या मागील वर्षी विविध संस्थांची ८० लाखांची बॅँक गॅरंटी जप्त केल्याचे कामत यांनी सांगितले.

प्रादेशिक कार्यालयाचे अधिकार

  1. प्रदूषण करणाऱ्या संस्थेला नोटीस देऊन कारवाईचा इशारा देणे.
  2. पाणी व वीज जोडणी तोडणे.
  3. शेवटी न्यायालयात दावा दाखल करणे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार