शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कोल्हापूर : शिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परत, शाळा कृती समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:08 IST

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळां कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.

ठळक मुद्देशिक्षकांनी केल्या ‘उत्तरपत्रिका’ परतकायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळ कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे,या प्रमुख मागणीसाठी कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बारावी परिक्षेच्या उत्तपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत सोमवारी एस एस सी बोर्डाला सुमारे पंधरा हजार उत्तरपत्रिका न तपासता परत केल्या.विना अनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षक गेली अठरा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर आणि काही ठिकाणी विना वेतन काम करत आहेत. या विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आली.

याची दखल घेवून काही शाळांचे मूल्यांकन करून १४६ शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या. ज्या शाळा अनुदानासाठी घोषित केल्या आहेत त्या शाळांच्या अनुदानाबाबत अद्याप कोणताच निर्णय दिला नाही. याबाबत पाठपुरावा करून सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.मात्र दहावी - बारावीची परीक्षेवेळी मात्र शासनाला आमच्या शिक्षकांची आठवण येते. त्यामुळे या विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उत्तरपत्रिकांची प्रतिकात्मक होळी करून शासनाचा निषेध नोंदवला होता. तरीही बोर्डाने या शिक्षकाकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासनीस पाठवली आहे.

या निषेध म्हणून शिक्षकांनी एसएससी बोर्डासमोर उत्तरपत्रिका परत करून तीव्र निषेध केला. यावेळी या शिक्षकांनी शासनाच्या विरोध घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.यावेळी बाजीराव बरगे, किरण पाटील, रामचंद्र खुडे, सागर पाटील, पल्लवी सुतार, जयश्री कांबळे, पूजा शिंगे, मीनाक्षी स्वामी, पल्लवी कांबळे, दिपाली चौगले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शिक्षक सहभागी झाले होते.

तीव्र निषेध....अनुदान मिळावे या मागणीसाठी संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी २१० वेळा आंदोलने करण्यात आली आहेत. या शिक्षकांना स्वत:चा चरितार्थ चालवण्यासाठी शेतमूजरी, रिक्षा चालवणे अन्य कामे करावी लागत आहेत. मात्र शासन कोणतीही दखल घेत नाही, फक्त दहावी - बारावी परीक्षेला आमच्याकडे लक्ष देत्या. त्यामुळे शासनला जाग आणण्यासाठी शिक्षकांनी खांद्यावर पेपर गठ्ठे घेवून शासनाचा विरोधात भर उन्हात तीव्र निषेध केला.

कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान तात्काळ द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन केले आहे. आमच्या शिक्षकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन सुमारे १५ हजार उत्तरपत्रिका बोर्डाला आज परत केल्या. पगार न मिळाल्याने शिक्षक वैफल्यग्रस्थ झाले आहेत. उत्तरपत्रिकांबाबत कोणतेही गैरकृत्य झाल्यास याला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील.- रत्नाकर माळी

 

  1. - भर उन्हात शिक्षकांचे आंदोलन
  2. - पेपर गठ्ठे खांद्यावर घेत केला निषेध
  3. - पंधरा हजार पेपर परत केले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकexamपरीक्षा