शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोल्हापूर :  तीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चा, महापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:57 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देतीन प्रभागांत फेरनिवडणुकीची चर्चामहापालिकेच्या प्रशासनाची तयारी सुरू

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे.

अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या प्रभागांत फेरनिवडणुकीची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात कोणती अडचण नसली तरी माजी महापौर अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात फेरनिवडणूक घ्यावी का, याबाबतचे अधिक मार्गदर्शन नगरविकास विभागाकडून मागविण्याचे ठरविले आहे.महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ - सिद्धार्थनगर येथून निवडून आलेले अफजल पीरजादे व प्रभाग क्रमांक ५५- पद्माराजे उद्यान येथून निवडून आलेले अजिंक्य चव्हाण यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार विभागीय आयुक्तांनी कारवाई केली असून, त्यांना नगरसेवकपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

या दोघांनी फेबु्रवारी महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलून राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील यांच्याविरोधात मतदान केले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी गटनेते सुनील पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती.माजी महापौर अश्विनी अमर रामाणे यांचे नगरसेवकपद सोमवारी (दि. १०) सकाळी साडेदहा वाजता रद्द करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बजावला. त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर जावे लागले होते. रामाणे यांचा ओबीसी दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नगरसेवकपद रद्दची कारवाई यापूर्वी करण्यात आली होती.

तसेच त्यांच्या प्रभागात निवडणूक प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयातून आयुक्तांच्या कारवाईला त्यांनी स्थगिती मिळविली होती. त्यामुळे त्या सभागृहात येऊन बसत होत्या. त्यानंतर त्यांच्या जातवैधता फेरपडताळणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना जातवैधता प्रमाणपत्र नव्याने मिळालेले नाही.

दरम्यान, जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांवरून एक वर्षाची करण्यात आली. सप्टेंबर २०१८ च्या अध्यादेशानुसार १५ दिवसांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली; पण त्यांना जातवैधता प्रमाणपत्रच प्राप्त झाले नसल्याने अंतिम १५ दिवसांतही ते त्यांना सादर करता आले नाही. त्यामुळे आयुक्तांनी ही कारवाई केली.पीरजादे व चव्हाण यांच्या प्रभागात निवडणूक घेण्यात यावी, अशी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात महापालिकेचे प्रशासनास कोणतीच अडचण राहिलेली नाही. मात्र अश्विनी रामाणे यांच्या प्रभागात मात्र यापूर्वीच फेरनिवडणूक घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने पुन्हा फेरनिवडणूक घेता येईल का, याबाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले आहे.

सदरचे मार्गदर्शन येताच तिन्ही प्रभागांत एकावेळी निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती केली जाणार आहे. या संदर्भातील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात महापालिका प्रशासन व्यस्त आहे.

‘स्थायी’वर परिणाम अशक्यसत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांना घरी जावे लागले असल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत काही बदल होईल का, अशी शंका उपस्थित केली जात होती; पण त्यामध्ये काही फरक पडणार नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सत्तारूढ गटाच्या तीन नगरसेवकांची पदे रद्द झाल्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ८१ वरून ७८ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थायी समितीवरील संख्याबळ तीनवरून दोनपर्यंत खाली आले, तर कॉँग्रेसचे संख्याबळ पाचवरून सहापर्यंत वाढले आहे. त्यामुळे त्यांचे आठ सदस्य ‘स्थायी’वर आहेत. शिवसेनेच्या एक सदस्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर