शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोल्हापूर : चव्हाण दाम्पत्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ उपोषण, खोटा गुन्हा दाखल करण्याऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:22 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.

ठळक मुद्देखोट्या गुन्ह्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करा खोटा गुन्हा दाखल करण्याऱ्यांवर कारवाई करा, चारूलता चव्हाणांची मागणीचव्हाण दाम्पत्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ उपोषण

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यामधील आरोपींशी हातमिळवणी करून आमच्यावर केला. गुन्ह्याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता राजेंद्र चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र (रा. एस-५, सारंग अपार्टमेंट) या दाम्पत्याने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाजवळ उपोषण केले.यापूर्वी याबाबतचे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना देण्यात आले होते. चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी व्हावी, अशा सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या होत्या; पण त्याबद्दल पुढे काहीही झाले नाही; म्हणून मी उपोषणाला बसले असल्याचे चारूलता चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.राजारामपुरी पोलिसांत एका गुन्ह्यात आरोपींवर कारवाईऐवजी त्यांच्याशी हातमिळवणी केली. हा तपास थांबवून कागदपत्रांमध्ये हवा तसा बदल करून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच खऱ्या गुन्ह्यातील पुरावा नष्ट करून खोटा पुरावा गोळा करण्यासाठी संबंधित अधिकारी आमच्या घरात बेकायदेशीररीत्या घुसले व त्यांनी मुलास मारहाण केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा. याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८१/२०१७ अशी पोलीस दप्तरी नोंद आहे.याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांचे पैसे मला तत्काळ परत मिळण्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून आदेश होऊनही जाणीवपूर्वक पोलीस अधीक्षक, कोल्हापूर कार्यालयाकडून पैसे मिळालेले नाहीत. सात वर्षे होऊनही मला न्याय मिळालेला नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांनी सांगितले.

राजारामपुरी पोलिसांत खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सुधाकरनगर येथील अ‍ॅड. चारूलता चव्हाण व त्यांचे पती राजेंद्र चव्हाण हे दाम्पत्य गुरुवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळ आमरण उपोषणास बसले होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार