शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:58 IST

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्तबैठकीत महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेला सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर यांनी दिला.प्रदुषणमुक्तीसाठी प्रदुषणमुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सुचना देत इचलकरंजीतील ६७ पैकी प्रदूषणास कारणीभूत असणारे ३६ कारखाने बंद करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर महापालिका आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर हे प्रथमच बुधवारी कोल्हापुरात आले.

त्यांनी सकाळी दुधाळी येथील एसटीपी प्लँट, जयंती नाल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीस, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे आयुक्त कुणाल खेमनार, महापालिका आयुक्तडॉ. अभिजित चौधरी, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदीजण उपस्थित होते.पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक घटक व कारखान्यांचे पाणी नदीत सोडले जाते, याबाबतचा सविस्तर सर्व्हे येत्या १५ आॅगस्टपर्यंत एमआयडीसीने पूर्ण करावा, अशी सूचना करून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीत लघु तसेच मध्यम उद्योग घटकाकडून सोडले जाणारे पाणी तसेच इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यात येणारे पाणी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व कार्यवाही करावी.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणीजिल्ह्यातील साखर कारखाने, डिस्टिलरी, एमआयडीसी, पॉवर लूम याबाबत किती कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळत नाहीत, अथवा त्या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण केले आहे का? याची माहिती मागविली; पण अशी माहिती उपलब्ध नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले, तर उद्योगांचे प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत मिसळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधून एमआयडीसीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.

इचलकरंजीतील ३६ कारखाने बंद करापंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचकरंजीतील ६७ पॉवरलूम कारखान्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ३६ कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी माहिती दिली, तर असे कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी