शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:58 IST

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्तबैठकीत महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेला सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर यांनी दिला.प्रदुषणमुक्तीसाठी प्रदुषणमुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सुचना देत इचलकरंजीतील ६७ पैकी प्रदूषणास कारणीभूत असणारे ३६ कारखाने बंद करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर महापालिका आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर हे प्रथमच बुधवारी कोल्हापुरात आले.

त्यांनी सकाळी दुधाळी येथील एसटीपी प्लँट, जयंती नाल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीस, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे आयुक्त कुणाल खेमनार, महापालिका आयुक्तडॉ. अभिजित चौधरी, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदीजण उपस्थित होते.पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक घटक व कारखान्यांचे पाणी नदीत सोडले जाते, याबाबतचा सविस्तर सर्व्हे येत्या १५ आॅगस्टपर्यंत एमआयडीसीने पूर्ण करावा, अशी सूचना करून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीत लघु तसेच मध्यम उद्योग घटकाकडून सोडले जाणारे पाणी तसेच इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यात येणारे पाणी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व कार्यवाही करावी.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणीजिल्ह्यातील साखर कारखाने, डिस्टिलरी, एमआयडीसी, पॉवर लूम याबाबत किती कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळत नाहीत, अथवा त्या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण केले आहे का? याची माहिती मागविली; पण अशी माहिती उपलब्ध नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले, तर उद्योगांचे प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत मिसळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधून एमआयडीसीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.

इचलकरंजीतील ३६ कारखाने बंद करापंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचकरंजीतील ६७ पॉवरलूम कारखान्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ३६ कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी माहिती दिली, तर असे कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी