शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोल्हापूर : कारखान्यांचे व्याज अनुदानाची २३८ कोटी येणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:09 IST

राज्यातील साखर कारखान्यांचे व्याज अनुदानाचे राज्य सरकारकडे २३८ कोटी रुपये येणे आहेत. ते सरकारकडून लवकर मिळावेत, अशी कारखानदारीची मागणी आहे. सध्या शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडे पैशांची मारामार झाली आहे अशा काळात ही रक्कम मिळाली तर कारखान्यांना थोडा दिलासा मिळू शकेल.

ठळक मुद्देकारखान्यांचे व्याज अनुदानाची २३८ कोटी येणेबाकीसरकारची जबाबदारी : बँकांनी केली परस्पर वसुली

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचे व्याज अनुदानाचे राज्य सरकारकडे २३८ कोटी रुपये येणे आहेत. ते सरकारकडून लवकर मिळावेत, अशी कारखानदारीची मागणी आहे. सध्या शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडे पैशांची मारामार झाली आहे अशा काळात ही रक्कम मिळाली तर कारखान्यांना थोडा दिलासा मिळू शकेल.हंगाम सन २०१५-१६ मध्ये साखरेचे दर घसरल्याने कारखानदारी अडचणीत आली होती. त्यावेळी एफआरपीही देण्याजोगी स्थिती नव्हती म्हणून केंद्र सरकारने एकूण राज्यातील १७६ कारखान्यांना २२०९ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले होते.

कच्ची साखर निर्यातीवर १७४ कोटी रुपयांचे कर्ज दिले त्याची १७ कोटी ४५ लाख अनुदान देय आहे. या कर्जावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली. ही रक्कम २३८ कोटी रुपये आहे. ही व्याज अनुदानावरील रक्कम सप्टेंबर २०१७ ला मिळायला हवी होती; परंतु त्यानंतर पाच महिने होत आले तरी ते उपलब्ध झालेले नाहीत.

उलट ज्या बँकांनी कारखान्यांना कर्जे दिली त्यांनी मात्र कारखान्यांकडून ही रक्कम वसूल करून घेतली आहे. त्यामुळे पैसे कारखान्यांचेच अडकून पडले आहेत.

ही रक्कम तातडीने मिळाल्यास कारखान्यांना दिलासा मिळू शकेल. ही रक्कम मिळण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाच्या पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत; परंतु या कार्यालयास त्यासंबंधी काही सोयरसुतक नसल्याचे अनुभव कारखानदारीस येत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने