शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कोल्हापूर : साखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर, फळबाजारात अननसांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 10:59 IST

गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.

ठळक मुद्देसाखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.यंदा साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दरात घसरण सुरू राहिली. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत साखर खाली आली; पण केंद्र सरकारच्या पातळीवर साखरेचे दर निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर लगेच त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.

गेले आठ दिवसांपासून साखरेचा दर थोडासा वधारण्यास सुरुवात झाली आहे. सरकी तेलाचे दर किरकोळ बाजारात ८५ रुपये किलोवर स्थिर आहेत. हरभराडाळ, तूरडाळीसह इतर डाळींच्या दरांत फारसा फरक पडलेला नाही. ज्वारी २० रुपयांपासून २८ रुपये किलोपर्यंत आहे. मिरचीचा हंगाम संपल्याने बाजारातील ‘ठसका’ काहीसा कमी झाला आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडीच्या दरात किलोमागे सरासरी पाच रुपयांची वाढ दिसते. गेले अनेक दिवस घाऊक बाजारात दोन ते सात रुपये किलोपर्यंत असणारा टोमॅटो या आठवड्यात तेरा रुपयांपर्यंत गेला आहे.

कोथिंबिरीची आवक स्थिर असली तरी मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. मान्सूनपूर्व पावसाने पालेभाज्यांची आवक एकदमच कमी झाल्याने दर तेजीत राहिले आहेत. मेथीची पेंढी २० रुपये झाली आहे.फळबाजारात गेले दीड-दोन महिने दरवळणारा हापूसचा वास काहीसा कमी झालेला दिसत आहे. आंब्याचा हंगाम संपत आला असला तरी फळबाजारात अननसांची आवक सुरू झाली आहे. रसरशीत अननस तीस रुपयांना मिळत आहे.‘पायरी’ ३० रुपये किलो!हापूस आंबा अजूनही शंभर रुपये डझनाच्या खाली नसला तरी किरकोळ बाजारात ‘पायरी’ आंबा सरासरी ३० रुपये किलो मिळत आहे. ग्राहकांच्या या आंब्यांवर उड्या पडत आहेत.

‘वटपौर्णिमा’ला आंब्याची टंचाई?वटपौर्णिमा साधारणत: जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात असते; त्यामुळे आंब्याचा हंगाम संपला तरी पौर्णिमेला आंबा उपलब्ध व्हायचा. यंदा अधिक महिन्यामुळे वटपौर्णिमा २७ जून रोजी येत असल्याने त्यावेळी आंब्याची टंचाई येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूरvegetableभाज्या