शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कोल्हापूर : साखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर, फळबाजारात अननसांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 10:59 IST

गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.

ठळक मुद्देसाखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.यंदा साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दरात घसरण सुरू राहिली. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत साखर खाली आली; पण केंद्र सरकारच्या पातळीवर साखरेचे दर निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर लगेच त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.

गेले आठ दिवसांपासून साखरेचा दर थोडासा वधारण्यास सुरुवात झाली आहे. सरकी तेलाचे दर किरकोळ बाजारात ८५ रुपये किलोवर स्थिर आहेत. हरभराडाळ, तूरडाळीसह इतर डाळींच्या दरांत फारसा फरक पडलेला नाही. ज्वारी २० रुपयांपासून २८ रुपये किलोपर्यंत आहे. मिरचीचा हंगाम संपल्याने बाजारातील ‘ठसका’ काहीसा कमी झाला आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडीच्या दरात किलोमागे सरासरी पाच रुपयांची वाढ दिसते. गेले अनेक दिवस घाऊक बाजारात दोन ते सात रुपये किलोपर्यंत असणारा टोमॅटो या आठवड्यात तेरा रुपयांपर्यंत गेला आहे.

कोथिंबिरीची आवक स्थिर असली तरी मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. मान्सूनपूर्व पावसाने पालेभाज्यांची आवक एकदमच कमी झाल्याने दर तेजीत राहिले आहेत. मेथीची पेंढी २० रुपये झाली आहे.फळबाजारात गेले दीड-दोन महिने दरवळणारा हापूसचा वास काहीसा कमी झालेला दिसत आहे. आंब्याचा हंगाम संपत आला असला तरी फळबाजारात अननसांची आवक सुरू झाली आहे. रसरशीत अननस तीस रुपयांना मिळत आहे.‘पायरी’ ३० रुपये किलो!हापूस आंबा अजूनही शंभर रुपये डझनाच्या खाली नसला तरी किरकोळ बाजारात ‘पायरी’ आंबा सरासरी ३० रुपये किलो मिळत आहे. ग्राहकांच्या या आंब्यांवर उड्या पडत आहेत.

‘वटपौर्णिमा’ला आंब्याची टंचाई?वटपौर्णिमा साधारणत: जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात असते; त्यामुळे आंब्याचा हंगाम संपला तरी पौर्णिमेला आंबा उपलब्ध व्हायचा. यंदा अधिक महिन्यामुळे वटपौर्णिमा २७ जून रोजी येत असल्याने त्यावेळी आंब्याची टंचाई येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूरvegetableभाज्या