शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोल्हापूर : साखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर, फळबाजारात अननसांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 10:59 IST

गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.

ठळक मुद्देसाखर, भाजीपाला वधारला, कडधान्याचे दर स्थिर आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : गेले दोन-तीन महिने घसरण सुरू असलेल्या साखरेचे दर काहीसे सुधारण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या स्थिर भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारावर परिणाम दिसत असून, किरकोळ बाजारात सध्या प्रतिकिलो ३३ रुपये दर राहिला आहे. आवक मंदावल्याने भाजीपालाही चांगलाच वधारला असला तरी कडधान्यांचे दर मात्र स्थिर आहे. फळबाजारामध्ये फारसा चढउतार दिसत नसला तरी हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने आवक मंदावली आहे.यंदा साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दरात घसरण सुरू राहिली. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल २७०० रुपयांपर्यंत साखर खाली आली; पण केंद्र सरकारच्या पातळीवर साखरेचे दर निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर लगेच त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.

गेले आठ दिवसांपासून साखरेचा दर थोडासा वधारण्यास सुरुवात झाली आहे. सरकी तेलाचे दर किरकोळ बाजारात ८५ रुपये किलोवर स्थिर आहेत. हरभराडाळ, तूरडाळीसह इतर डाळींच्या दरांत फारसा फरक पडलेला नाही. ज्वारी २० रुपयांपासून २८ रुपये किलोपर्यंत आहे. मिरचीचा हंगाम संपल्याने बाजारातील ‘ठसका’ काहीसा कमी झाला आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. कोबी, वांगी, ढबू, गवार, कारली, भेंडीच्या दरात किलोमागे सरासरी पाच रुपयांची वाढ दिसते. गेले अनेक दिवस घाऊक बाजारात दोन ते सात रुपये किलोपर्यंत असणारा टोमॅटो या आठवड्यात तेरा रुपयांपर्यंत गेला आहे.

कोथिंबिरीची आवक स्थिर असली तरी मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. मान्सूनपूर्व पावसाने पालेभाज्यांची आवक एकदमच कमी झाल्याने दर तेजीत राहिले आहेत. मेथीची पेंढी २० रुपये झाली आहे.फळबाजारात गेले दीड-दोन महिने दरवळणारा हापूसचा वास काहीसा कमी झालेला दिसत आहे. आंब्याचा हंगाम संपत आला असला तरी फळबाजारात अननसांची आवक सुरू झाली आहे. रसरशीत अननस तीस रुपयांना मिळत आहे.‘पायरी’ ३० रुपये किलो!हापूस आंबा अजूनही शंभर रुपये डझनाच्या खाली नसला तरी किरकोळ बाजारात ‘पायरी’ आंबा सरासरी ३० रुपये किलो मिळत आहे. ग्राहकांच्या या आंब्यांवर उड्या पडत आहेत.

‘वटपौर्णिमा’ला आंब्याची टंचाई?वटपौर्णिमा साधारणत: जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात असते; त्यामुळे आंब्याचा हंगाम संपला तरी पौर्णिमेला आंबा उपलब्ध व्हायचा. यंदा अधिक महिन्यामुळे वटपौर्णिमा २७ जून रोजी येत असल्याने त्यावेळी आंब्याची टंचाई येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूरvegetableभाज्या