शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

कोल्हापूर :  पिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:03 IST

नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देपिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप बाधित

कोल्हापूर : नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला असून, तीन महिन्यांत तब्बल १७ हजार ५२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला असून, नदीकाठच्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उभा ऊस आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिल्याने वाढ खुंटली आहे. त्यात जास्त दिवस उसाच्या सुरळीत पाणी राहिल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने झाल्याने नदीकाठचे ऊस शंभर टक्के संपले आहेत.

उर्वरित ठिकाणचे ऊस पिकेही अडचणीत आली आहेत. साधारणत: कोणत्याही पिकाला सूर्यप्रकाश लागतोच, त्याशिवाय वाढ होत नाही; पण तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने ऊस गारठला आहे. आपल्याकडे जून, जुलै मध्ये पाऊस असला तरी आॅगस्टमध्ये उघडझाप राहते, पावसाचे एखादे ‘नक्षत्र’ लागले, तरी दुसरे कोरडे जाते; त्यामुळे या काळात पिकांची वाढ जोमदार होते.

यंदा मात्र सलग पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमीच झालेला नाही. भात, सोयाबीन, भुईमूग, नागली या पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. ज्वारी व नागली ही पिके कमी पाण्यावर येतात. अतिपावसाने वाढ खुंटली आहे, ज्वारीही तीन महिन्यांत बाहेर पडते; पण सध्या ज्वारीची उंची दीड ते दोन फुटांपर्यंतच असल्याने उत्पादन घटणार हे निश्चित आहे.जिल्ह्यात ऊस, भात, सोयाबीन व भुईमूगाचे ३ लाख ४६ हजार ६९२ हेक्टर क्षेत्र आहे. यांपैकी १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे; पण पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. नदीकाठच्या क्षेत्रात अजून पाणी असल्याने अधिकाऱ्यांना तिथेपर्यंत जाता येत नसल्याने गोची झाली आहे.‘९२००५’ ऊस करपला!सततच्या पावसाने सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. उसातही ‘९२००५’ या वाणाला अधिक झटका बसला असून ‘करपा’ आणि सुरळीत पाणी गेल्याने सारे पिकच करपल्यासारखे झाले आहे. परिणामी उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे.

भाताला ‘पानफोल’चा धोकाअलिकडील पाच-सहा वर्षांत लवकर येणाऱ्या भाताच्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ‘तेली आमसा’, ‘राशी पूनम’ या वाणाचे भात साडे तीन महिन्यांत परिपक्व होते. याबरोबरच मे महिन्यात धूळवाफ पेरणी झालेले भाताची लोंबे बाहेर पडली आहेत. अशा कालावधीत एकसारखा पाऊस घातक असून ‘पानफोल’ होण्याचा धोका आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीयंदा पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खते व बियाण्यांचे वाढलेल्या दरामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे; त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

नदीकाठचे ऊस पूर्णपणे संपले आहेत, उर्वरित ठिकाणच्या उसावर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. इतर पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झाले आहे.- युवराज खाडे (शेतकरी, सांगरुळ) 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर