शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  पिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:03 IST

नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देपिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप बाधित

कोल्हापूर : नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला असून, तीन महिन्यांत तब्बल १७ हजार ५२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला असून, नदीकाठच्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उभा ऊस आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिल्याने वाढ खुंटली आहे. त्यात जास्त दिवस उसाच्या सुरळीत पाणी राहिल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने झाल्याने नदीकाठचे ऊस शंभर टक्के संपले आहेत.

उर्वरित ठिकाणचे ऊस पिकेही अडचणीत आली आहेत. साधारणत: कोणत्याही पिकाला सूर्यप्रकाश लागतोच, त्याशिवाय वाढ होत नाही; पण तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने ऊस गारठला आहे. आपल्याकडे जून, जुलै मध्ये पाऊस असला तरी आॅगस्टमध्ये उघडझाप राहते, पावसाचे एखादे ‘नक्षत्र’ लागले, तरी दुसरे कोरडे जाते; त्यामुळे या काळात पिकांची वाढ जोमदार होते.

यंदा मात्र सलग पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमीच झालेला नाही. भात, सोयाबीन, भुईमूग, नागली या पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. ज्वारी व नागली ही पिके कमी पाण्यावर येतात. अतिपावसाने वाढ खुंटली आहे, ज्वारीही तीन महिन्यांत बाहेर पडते; पण सध्या ज्वारीची उंची दीड ते दोन फुटांपर्यंतच असल्याने उत्पादन घटणार हे निश्चित आहे.जिल्ह्यात ऊस, भात, सोयाबीन व भुईमूगाचे ३ लाख ४६ हजार ६९२ हेक्टर क्षेत्र आहे. यांपैकी १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे; पण पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. नदीकाठच्या क्षेत्रात अजून पाणी असल्याने अधिकाऱ्यांना तिथेपर्यंत जाता येत नसल्याने गोची झाली आहे.‘९२००५’ ऊस करपला!सततच्या पावसाने सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. उसातही ‘९२००५’ या वाणाला अधिक झटका बसला असून ‘करपा’ आणि सुरळीत पाणी गेल्याने सारे पिकच करपल्यासारखे झाले आहे. परिणामी उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे.

भाताला ‘पानफोल’चा धोकाअलिकडील पाच-सहा वर्षांत लवकर येणाऱ्या भाताच्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ‘तेली आमसा’, ‘राशी पूनम’ या वाणाचे भात साडे तीन महिन्यांत परिपक्व होते. याबरोबरच मे महिन्यात धूळवाफ पेरणी झालेले भाताची लोंबे बाहेर पडली आहेत. अशा कालावधीत एकसारखा पाऊस घातक असून ‘पानफोल’ होण्याचा धोका आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीयंदा पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खते व बियाण्यांचे वाढलेल्या दरामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे; त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

नदीकाठचे ऊस पूर्णपणे संपले आहेत, उर्वरित ठिकाणच्या उसावर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. इतर पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झाले आहे.- युवराज खाडे (शेतकरी, सांगरुळ) 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर