शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:01 IST

‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला प्रारंभकेंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

कोल्हापूर : ‘पेपर शांतपणे सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘गोंधळून जाऊ नको’ अशा सूचना स्वीकारीत बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातून या वर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून एकूण १ लाख २९ हजार परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण १५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर महाविद्यालय, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला महाविद्यालय, आदी परीक्षा केंद्रे सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेली.

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आई-वडील, आजी-आजोबांसह अन्य नातेवाईक यांचे आशीर्वाद घेऊन, तर काहींनी सकाळी विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेतले. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी काही पालकांनी सुटी घेतली होती; तर काहीजण अर्धी रजा घेतली होती. केंद्राबाहेरील परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी नोट्स, पुस्तकांवर अखेरची नजर टाकली.

काहीजणांनी चर्चेतून उजळणी केली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. त्यांना पेपरप्रारंभाच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.

महाविद्यालयांनी प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली आहे. परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाची भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. पालक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी पेपर सुटेपर्यंत आपल्या पाल्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर थांबून होते.

काहीसा तणावपहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. पेपर सुटल्यानंतर ‘पेपर सोपा होता’, ‘पेपर चांगला लिहिला’, ‘हुश्श... झाला इंग्रजीचा पेपर’ अशा प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या. पेपर झाल्यानंतर केंद्राच्या आवारात एकमेकांशी पेपरबाबत परीक्षार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. बहुतांश परीक्षार्थ्यांनी दुसऱ्या पेपरची तयारी करण्यासाठी लवकर घरी जाण्यास प्राधान्य दिले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षा