शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जीव टांगणीला, पाळणा झाडाला, उपोषणस्थळी कोतवालांची परिस्थिती विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:58 IST

सरकार सांगेल ती कामे करायची, काळ-वेळ न पाहता कामासाठी धावायचे, पंचनामे करायचे, निवडणुकीची कामे करायची; तरीही महिन्याकाठी पाचएक हजारांच्या मानधनापलीकडे हातात काहीच नाही, या परिस्थितीला वैतागलेल्या कोतवालांनी अखेर आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली.

ठळक मुद्देजीव टांगणीला, पाळणा झाडाला, उपोषणस्थळी कोतवालांची परिस्थिती विदारकजिल्हाधिकारी कार्यालयासमोर २१ व्या दिवशीही उपोषण सुरूच

कोल्हापूर : सरकार सांगेल ती कामे करायची, काळ-वेळ न पाहता कामासाठी धावायचे, पंचनामे करायचे, निवडणुकीची कामे करायची; तरीही महिन्याकाठी पाचएक हजारांच्या मानधनापलीकडे हातात काहीच नाही, या परिस्थितीला वैतागलेल्या कोतवालांनी अखेर आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली.

गेल्या २१ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसलेल्या कोतवालांकडे सरकारने लक्ष दिलेले नाही. वर्गणी काढून, आंदोलनस्थळीच भात-आमटी शिजवून पोटाची खळगी भरली जात आहेत. महिला कोतवालांचे लहान बाळ झाडालाच बांधलेल्या पाळण्यात आपल्या आईच्या उद्याच्या भविष्याची स्वप्ने पाहत गाढ झोपी जात आहे. असे हे उपोषणस्थळाचे चित्र मन विषण्ण करणारे आहे.महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेत काम करणाऱ्या कोतवालांनी, शासनाने आपणाला चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे, म्हणून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच वेळी आंदोलन सुरू केले आहे. ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनाचा बुधवारी २१ वा दिवस होता. राज्यभर ‘भीख माँगो’ आंदोलन होत असताना कोल्हापुरात टाळ वाजवून कोतवालांनी शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.न्यायाच्या प्रतीक्षेत आंदोलनस्थळी बसलेल्या ४५० कोतवालांची जेवण-पाण्याची आबाळ सुरू आहे. कोतवालांनीच वर्गणी काढून भात-आमटी करून खाण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन स्थळाच्याच बाजूला हे अन्न शिजवून पत्रावळ्यांतून वाढले जात आहे. गेल्या २१ दिवसांपासून भात-आमटीपलीकडे दुसरे जेवण नसल्याने आतापर्यंत तीन कोतवालांची प्रकृती बिघडली आहे. कसबा बावड्यातील कोतवाल सर्जेराव काळे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

बुधवारी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने खासदार संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी कोतवालांनी दिलेल्या निवेदनावर अभिप्राय लिहीत संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र तयार करून ते लगेच फॅक्सही केले. या संदर्भात स्थापन केलेल्या सचिवांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार १४ हजार ९६९ रुपये मानधन देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन दिले.

कोतवालांचे सध्याचे मानधन ५ हजार १० रुपये आहे. पाच वर्षांपूर्वी ते तीन हजार रुपये होते. गेल्या पाच वर्षांत केवळ दोन हजारांची त्यात वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत महागाईने टोक गाठले असताना कोतवालांना मात्र पाच हजारांतच कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. आर्थिक विवंचनेमुळेच कोतवालांनी ‘आता नाही तर कधीच नाही,’ अशी भूमिका घेत निर्धाराने आंदोलन सुरू ठेवले आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर