शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बालकल्याण समितीच्या शुभांगी जोशी अध्यक्षा, नव्या नियुक्त्या : बालन्याय मंडळावर चोरगे, देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:19 IST

काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या नियुक्त्या तीन वर्षांसाठी आहेत. श्रीमती जोशी या गेली पंधरा वर्षे समाजकार्यात आहेत. शासनाच्या समितीवरही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

ठळक मुद्देबालकल्याण समितीच्या शुभांगी जोशी अध्यक्षानव्या नियुक्त्या : बालन्याय मंडळावर चोरगे, देशपांडे

कोल्हापूर : काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसंदर्भात अंतिम निर्णय घेणारे न्यायालयीन खंडपीठ असलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी शासनाने इचलकरंजीच्या शुभांगी दामोदर जोशी यांची नियुक्ती केली. यापूर्वी प्रियदर्शिनी चोरगे या समितीच्या अध्यक्षा होत्या. नव्या नियुक्त्या तीन वर्षांसाठी आहेत. जोशी या गेली पंधरा वर्षे समाजकार्यात आहेत. शासनाच्या समितीवरही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.या समितीच्या सदस्यपदी प्रा.जे. के. पवार, बालकल्याण संकुलातील माजी कर्मचारी कांचन सुभाष अंगडी व व्ही. बी. शेटे आणि कोरोचीचे अ‍ॅड. दिलशाही इलाही मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या समितीत आभास फौंडेशनचे अतुल देसाई, दीपक भोसले, डॉ. शुभदा दिवाण व संजय देशपांडे यांचा समावेश होता.

या समितीच्या सदस्यांना प्रत्येक बैठकीला दीड हजार रुपये मानधन दिले जाते. महिन्याला समितीच्या सरासरी २० बैठका होतात. बालकल्याण समितीचे कामकाज बालकल्याण संकुलातून चालते व बाल न्याय मंडळाचे कामकाज सीपीआर समोरील जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतून चालते. दोन्ही समित्यांना प्रत्येक बैठकीत न्यायालयीन सहा तास काम करणे बंधनकारक आहे.बालकल्याण समितीबरोबरच शासनाने बालन्याय मंडळावरील सदस्यांचीही नव्याने नियुक्ती केली आहे. बालन्याय मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीशांनी नियुक्त केलेले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी काम पाहतात. दोन सामाजिक कार्यकर्ते सदस्य असतात. त्यामध्ये प्रियदर्शिनी चोरगे व संजय देशपांडे यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी राजश्री साकळे व व्ही. बी. शेटे हे सदस्य म्हणून काम पाहत होते.शासनाने या दोन्ही समित्यांच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सदस्यांच्या नियुक्तीचे राजपत्र दि. ७ एप्रिलला प्रसिद्ध केले आहे. बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा २)मधील कलम २७ च्या पोटकलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेले अधिकार व त्याअनुषंगाने देण्यात आलेले इतर अधिकार यांचा वापर करून ही समिती स्थापन करण्यात येते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwomen and child developmentमहिला आणि बालविकास