शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींसाठी शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:25 IST

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

ठळक मुद्देवधू महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावीजिल्हा नियोजन विकास समितीमार्फत विवाह योजना वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे.सामूहिक विवाहाबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांनी केले आहे.या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ११ लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिली जाते.

आई नसल्यास वडिलांच्या नावाने दिली जाते. आई-वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. सामूहिक विवाहाचे आयोजन विवाह समारंभाच्या खर्चासाठी २ हजार रुपये अनुदान दिले जाते.शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी वधू महाराष्ट्रातील  संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, संबंधित व्यक्तीकडे ग्रामसेवक तलाठी दाखला असावा.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार