शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कोल्हापूर : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींसाठी शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:25 IST

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

ठळक मुद्देवधू महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावीजिल्हा नियोजन विकास समितीमार्फत विवाह योजना वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे.सामूहिक विवाहाबाबत अधिक माहितीसाठी संबंधितांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांनी केले आहे.या योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा ११ लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी १० हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिली जाते.

आई नसल्यास वडिलांच्या नावाने दिली जाते. आई-वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. सामूहिक विवाहाचे आयोजन विवाह समारंभाच्या खर्चासाठी २ हजार रुपये अनुदान दिले जाते.शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी वधू महाराष्ट्रातील  संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, संबंधित व्यक्तीकडे ग्रामसेवक तलाठी दाखला असावा.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार