शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

कोल्हापूर : ‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू, राज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 16:14 IST

राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू

कोल्हापूर : राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले.आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

या उद्देशाने राज्य शासनाने दुकाने व आस्थापनाही आठवड्यातील सातही दिवस सुरु राहण्यास मुभा दिली. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. विशेषत: मॉल, किरकोळ दुकाने, औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने , आदींना त्याचा फायदा होईल. या निर्णयाचे स्वागत कोल्हापूरातील व्यापारी वर्गानेही स्वागत केले आहे.

यासह ९ पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व कारखाना यांना गुमास्ता परवाना घ्यावा लागत होता. तो आता घ्यावा लागणार नाही. त्यामुळे छोट्या व्यापाºयांनाही आता एक किंवा दोन कामगार असले तरी त्याची गुमास्ताकडे नोंदणी करावी लागणार नाही. या निर्णयाचेही स्वागत करण्यात आले.

 

मुळातच औषध दुकानाना याचा फायदा होणार आहे. अधिकृतरित्या राज्य शासनानेच शिक्कामोर्तब केल्याने दुकानदार सुरक्षित झाले. छोट्या घाऊक औषध दुकानदारांनाही गुमास्ता कायद्यातही दुरुस्ती केल्याने फायदा होणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परवान्याबाबतच्या कटकटी यातून मिटणार आहेत.- मदन पाटील,कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन

 

राज्य शासनाच्या सात दिवस दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण धान्य व्यापारी वर्गात मुळातच मंदीचे दिवस सुरु आहेत. त्यात सात दिवस दुकाने उघडी ठेवणे परवडण्यासारखे नाही. गुमास्ता कायद्यात बदल करुन सरकारने व्यापाºयांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.वैभव सावर्डेकर,धान्य व्यापारी,

 

परदेशाप्रमाणे आपल्याकडेही राज्य शासनाने अशा प्रकारे निर्णय घेऊन व्यापारी, उद्योजकांना एक प्रकारे दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्राला निश्चितच फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- बाबासाो कोंडेकर,अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरीग असोसिएशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर