शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू, राज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 16:14 IST

राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या निर्णयाचे व्यापारी वर्गाकडून स्वागत‘दुकाने व आस्थापना ’ अधिनियम लागू

कोल्हापूर : राज्यात बुधवारपासून ‘दुकाने व आस्थापना’ लागू करण्यात आला. यात सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापूरातील सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले.आजच्या काळात माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या स्वरुपामुळे २४ बा ७ असे प्रत्येक क्षेत्रात स्वरुप आले आहे. आॅनलाईनमुळे व्यवसाय २४ तास सुरु असतात. त्यामुळे आॅफलाईन दुकानानाही त्याचा फायदा व्हावा.

या उद्देशाने राज्य शासनाने दुकाने व आस्थापनाही आठवड्यातील सातही दिवस सुरु राहण्यास मुभा दिली. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. विशेषत: मॉल, किरकोळ दुकाने, औषध दुकाने, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने , आदींना त्याचा फायदा होईल. या निर्णयाचे स्वागत कोल्हापूरातील व्यापारी वर्गानेही स्वागत केले आहे.

यासह ९ पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व कारखाना यांना गुमास्ता परवाना घ्यावा लागत होता. तो आता घ्यावा लागणार नाही. त्यामुळे छोट्या व्यापाºयांनाही आता एक किंवा दोन कामगार असले तरी त्याची गुमास्ताकडे नोंदणी करावी लागणार नाही. या निर्णयाचेही स्वागत करण्यात आले.

 

मुळातच औषध दुकानाना याचा फायदा होणार आहे. अधिकृतरित्या राज्य शासनानेच शिक्कामोर्तब केल्याने दुकानदार सुरक्षित झाले. छोट्या घाऊक औषध दुकानदारांनाही गुमास्ता कायद्यातही दुरुस्ती केल्याने फायदा होणार आहे. राज्य शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परवान्याबाबतच्या कटकटी यातून मिटणार आहेत.- मदन पाटील,कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन

 

राज्य शासनाच्या सात दिवस दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण धान्य व्यापारी वर्गात मुळातच मंदीचे दिवस सुरु आहेत. त्यात सात दिवस दुकाने उघडी ठेवणे परवडण्यासारखे नाही. गुमास्ता कायद्यात बदल करुन सरकारने व्यापाºयांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.वैभव सावर्डेकर,धान्य व्यापारी,

 

परदेशाप्रमाणे आपल्याकडेही राज्य शासनाने अशा प्रकारे निर्णय घेऊन व्यापारी, उद्योजकांना एक प्रकारे दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्राला निश्चितच फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- बाबासाो कोंडेकर,अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरीग असोसिएशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर